अ‍ॅपशहर

उज्वला गॅस कनेक्शनचे वाटप

म टा...

Maharashtra Times 16 Jul 2018, 4:00 am

म. टा. वृत्तसेवा ​, पाथर्डी

​ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी चुल आणि लाकडी सरपण मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होण्याबरोबरच ​ महिलांमध्ये आजार वाढीस लागले असून ते ​रोखण्यासाठी उज्वला गॅस योजनेच्या माध्यमतून मोफत गॅस कनेक्शन देण्याचे काम प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यामुळे ​ महिलांचे आयुष्यमान उंचावण्याचे काम खऱ्या अर्थाने होत असल्याचे मत भारतीय जनता पार्टी युवा ​ मोर्चाचे तालुकाध्यक्ष ​ अमोल गर्जे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील भिलवडे, आंबिकानगर येथील उज्वला योजने अंतर्गत लाभार्थाना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. या वेळी ह. भ. प. गणेश महाराज ​ बडे​,​ राजेंद्र बडे, उपसरंपच बडे, बाळासाहेब बडे, बाबासाहेब बडे, सुरेश बडे, सुभाष बडे, पंडित बडे, आासाराम बडे उपस्थित होते.

या वेळी ​ बोलताना गर्जे म्हणाले, उज्वला योजनेच्या माध्यमातून तालुक्यात सुमारे सात हजार लाभार्थ्यांना कनेक्शन वाटप केले आहे. केंद्र सरकारने प्रत्येक घरात महिलांच्या स्वयपाकासाठी गॅस देण्याची ध्येय ठेवले असून धूर मुक्त गाव करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतला आहे. खेड्या गावातील महिला भगिनी रोजचे अन्न शिजवणे, चहा, पाणी चुलीवर केले जाते. त्यासाठी होत असलेल्या लाकूडतोडीमुळे वृक्षतोड होत असून पर्यावरणासाठी घातक असल्याचे ते शेवटी म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज