म. टा. वृत्तसेवा, अकोले
सह्याद्रीच्या कडेकपारीतून धो-धो पडणारा पाऊस व वेगाने खळाळणारे ओढे-नाले यामुळे भंडारदरा जलाशय सोमवारी दुपारी एक वाजता तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी जलाशयाचे पूजन करून जाहीर केले. स्पिलवेमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जलसंपदाचे सर्व अधिकारी या वेळी उपस्थित होते.
भंडारदरा जलाशय म्हणजे उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असून या पाण्यावर लाभ क्षेत्रातील शेती फुलवली जाते. त्यातूनच सहकार व समाजकारण व राजकारण केले जाते, असा हा जलाशय ३० वर्षांत २५ वेळा पूर्ण क्षमतेने भरला तर ५ वेळा भरला नाही. धरणात १९८७ मध्ये झालेला पाणीसाठा ५ हजार ८६६ दशलक्ष घनफूट होता, १९८९ - १० हजार १४७, १९९५ - ९ हजार ४९८, २००० - ८ हजार ८५१, २०१५ मध्ये ८ हजार ६५७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. जुलै महिन्यात धरण भरण्याची ही दुसरी वेळ आहे.
अकोले पाटबंधारे विभागाचे उप अभियंता जी. जी. थोरात, शाखाधिकारी आर. एम. कांबळे यांनी धरणाच्या परिस्थितीकडे लक्ष केंद्रित केले असून पाण्याची आवक अधिक झाल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास १० हजार ५०७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर एक वाजता कार्यकारी अभियंता यांनी धारण भरल्याचे जाहीर केले. या वेळी ६ तासांत भंडारदरा येथे ३९ मिमी पाऊस झाला. तर व्हॉल्व्हमधून १८०, टनेल मधून ८२३ व स्पिलवे मधून ६०९ असा १ हजार ६१२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. निळवंडे जलाशयात ५ हजार ५८ दशलक्ष घनफूट, आढळामध्ये ६४० दशलक्ष घनफूट साठा होता. मुळा व प्रवरा नदी दुथडी भरून वाहत होती. चार दिवसांपासून अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने भात खाचरे तुडुंब भरली आहेत. रस्त्यावर पाणी वाहत होते. सोमवारी दुपारी भाजपचे जेष्ठ नेते अशोक भांगरे, दिलीप भांगरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे, सरपंच संगीता भांगरे यांनीही जलाशयाचे पूजन केले. प्रवरा, कृष्णवंती नदी दुथडी भरून वाहत होती. सुमारे ५ हजार क्युसेकने प्रवाह सुरू होता.
सह्याद्रीच्या कडेकपारीतून धो-धो पडणारा पाऊस व वेगाने खळाळणारे ओढे-नाले यामुळे भंडारदरा जलाशय सोमवारी दुपारी एक वाजता तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी जलाशयाचे पूजन करून जाहीर केले. स्पिलवेमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जलसंपदाचे सर्व अधिकारी या वेळी उपस्थित होते.
भंडारदरा जलाशय म्हणजे उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असून या पाण्यावर लाभ क्षेत्रातील शेती फुलवली जाते. त्यातूनच सहकार व समाजकारण व राजकारण केले जाते, असा हा जलाशय ३० वर्षांत २५ वेळा पूर्ण क्षमतेने भरला तर ५ वेळा भरला नाही. धरणात १९८७ मध्ये झालेला पाणीसाठा ५ हजार ८६६ दशलक्ष घनफूट होता, १९८९ - १० हजार १४७, १९९५ - ९ हजार ४९८, २००० - ८ हजार ८५१, २०१५ मध्ये ८ हजार ६५७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. जुलै महिन्यात धरण भरण्याची ही दुसरी वेळ आहे.
अकोले पाटबंधारे विभागाचे उप अभियंता जी. जी. थोरात, शाखाधिकारी आर. एम. कांबळे यांनी धरणाच्या परिस्थितीकडे लक्ष केंद्रित केले असून पाण्याची आवक अधिक झाल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास १० हजार ५०७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर एक वाजता कार्यकारी अभियंता यांनी धारण भरल्याचे जाहीर केले. या वेळी ६ तासांत भंडारदरा येथे ३९ मिमी पाऊस झाला. तर व्हॉल्व्हमधून १८०, टनेल मधून ८२३ व स्पिलवे मधून ६०९ असा १ हजार ६१२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. निळवंडे जलाशयात ५ हजार ५८ दशलक्ष घनफूट, आढळामध्ये ६४० दशलक्ष घनफूट साठा होता. मुळा व प्रवरा नदी दुथडी भरून वाहत होती. चार दिवसांपासून अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने भात खाचरे तुडुंब भरली आहेत. रस्त्यावर पाणी वाहत होते. सोमवारी दुपारी भाजपचे जेष्ठ नेते अशोक भांगरे, दिलीप भांगरे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे, सरपंच संगीता भांगरे यांनीही जलाशयाचे पूजन केले. प्रवरा, कृष्णवंती नदी दुथडी भरून वाहत होती. सुमारे ५ हजार क्युसेकने प्रवाह सुरू होता.