अहमदनगर: 'राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांनी जी सोशल मीडियावर माहिती दिली, ती अत्यंत धक्कादायक होती. जनतेमध्ये लोकप्रिय असणारा नेता 'एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली' असा संदेश देतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे,' अशी टीका करतानाच, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हक्कालपट्टी करण्याची मागणी केली आहे. (Trupti Desai of Bhumata Brigade demands Dhananjay Munde's Resignation)
वाचा: '...तर मोदींना रोज राजीनामा द्यावा लागेल; राऊतांची जोरदार फटकेबाजी'
'धनंजय मुंडे हे राज्यातील जबाबदार नेते आहेत. कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्यावर जेव्हा एका महिलेने आरोप केले व त्यानंतर त्यांनी जी सोशल मीडियावर माहिती दिली, ती अत्यंत धक्कादायक होती. जनतेमध्ये लोकप्रिय असणारा नेता "एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली" अशा पद्धतीचा संदेश देतो, हे पूर्णपणे चुकीचे आहे. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी झाली पाहिजे,' अशी मागणी देसाई यांनी केली आहे. तसेच, रेणू शर्मा या महिलेने जी तक्रार केली, त्या आधारे गुन्हा दाखल व्हावा. संबंधित महिलेने कोणाला ब्लॅकमेल केले असेल तर तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा,' अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.
वाचा: धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद तूर्त वाचलं; 'हा' मुद्दा ठरला महत्त्वाचा
'उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनीही तातडीने मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. महिला सबलीकरण म्हणून राष्ट्रवादी पक्ष काम करतो. त्यामुळे शरद पवार व सुप्रिया सुळे यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे,' असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
पीएमसी बँक घोटाळा: संजय राऊतांच्या पत्नीने 'ते' ५५ लाख केले परत
वाचा: '...तर मोदींना रोज राजीनामा द्यावा लागेल; राऊतांची जोरदार फटकेबाजी'
'धनंजय मुंडे हे राज्यातील जबाबदार नेते आहेत. कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्यावर जेव्हा एका महिलेने आरोप केले व त्यानंतर त्यांनी जी सोशल मीडियावर माहिती दिली, ती अत्यंत धक्कादायक होती. जनतेमध्ये लोकप्रिय असणारा नेता "एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली" अशा पद्धतीचा संदेश देतो, हे पूर्णपणे चुकीचे आहे. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी झाली पाहिजे,' अशी मागणी देसाई यांनी केली आहे. तसेच, रेणू शर्मा या महिलेने जी तक्रार केली, त्या आधारे गुन्हा दाखल व्हावा. संबंधित महिलेने कोणाला ब्लॅकमेल केले असेल तर तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा,' अशी मागणीही देसाई यांनी केली आहे.
वाचा: धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद तूर्त वाचलं; 'हा' मुद्दा ठरला महत्त्वाचा
'उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनीही तातडीने मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. महिला सबलीकरण म्हणून राष्ट्रवादी पक्ष काम करतो. त्यामुळे शरद पवार व सुप्रिया सुळे यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे,' असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
पीएमसी बँक घोटाळा: संजय राऊतांच्या पत्नीने 'ते' ५५ लाख केले परत