अ‍ॅपशहर

सताधाऱ्यांनी बसविली अर्थकारणाला खिळ

'देशात एका भांडवलदाराची सत्ता जाऊन दुसऱ्या भांडवलदाराची सत्ता आली आहे...

Maharashtra Times 13 Jun 2018, 2:09 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bjp government nail to the economy cpi leader tukaram bhasme
सताधाऱ्यांनी बसविली अर्थकारणाला खिळ


'देशात एका भांडवलदाराची सत्ता जाऊन दुसऱ्या भांडवलदाराची सत्ता आली आहे. विकासासाठी देशातील अर्थकारण महत्त्वाचे ठरते; मात्र, या सत्ताधाऱ्यांनी अर्थकारणाला जबरदस्त खिळ बसवली आहे', असा आरोप भाकपचे राज्यसचिव तुकाराम भस्मे यांनी केला.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची कोल्लम (केरळ) येथे नुकतीच राष्ट्रीय परिषद पार पडली. या पार्श्‍वभूमीवर पक्षाची पुढील ध्येय, धोरणांवर चर्चा करण्यासाठी बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालयात जिल्हा कौन्सिल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भस्मे बोलत होते. बाबा आरगडे, जिल्हासचिव शांताराम वाळूंज, राज्य सहसचिव सुभाष लांडे, स्मिता पानसरे, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, बन्सी सातपुते, संतोष खोडदे, सुलाबाई आदमने, कारभारी उगले, शंकर न्यालपेल्ली, रमेश नागवडे, एल. एम. डांगे, लक्ष्मण नवले, अप्पासाहेब वाबळे, सुरेश पानसरे, भारती न्यालपेल्ली, विलास नवले, कानिफ तांबे, आर. डी. चौधरी यांच्यासह भाकपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

'सर्वांना न्याय मिळेल असे चित्र उभे करून भाजप सत्तेवर आले; मात्र, त्यांचे धोरण पाहून सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे', असे सांगून भस्मे म्हणाले, 'देशातील शेतकरी संपावर जात असून, यावरून भविष्यातील संकट दिसत आहे. हौसेपोटी शेतकऱ्यांनी संप केला नसून, हा झालेल्या अन्यायाचा उद्रेक आहे. या सरकारला उलथवण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे', अशी भूमिकाही त्यांनी मांडली. सुभाष लांडे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी सूत्रसंचलन केले. संतोष खोडदे यांनी आभार मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज