अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई वो हौदसे नही आती' अशी मार्मिक टिपणी त्यांनी केली. ते म्हणाले, ‘आधी आपल्या पक्षाच्या बगलबच्चांकडून वक्तव्य करून घ्यायची आणि नंतर समाजाला गोंजारत बसायचे ही पवारांची जुनीच नीती आहे. त्यांच्या या भुलभूलैय्याला जनता भुलणार नाही,’ असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला आहे. (bjp leader radhakrishna vikhe patil criticizes ncp supremo sharad pawar) संगमनेरमध्ये विखे पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘ओबीसी आरक्षणाठी नेमलेल्या समर्पित आयोगाचे राज्यात प्रत्येक महसूल विभागात सुरू असलेले दौरे म्हणजे केवळ फार्स आहे. दोन तासांच्या भेटीमधून आयोग नेमका कोणता डेटा गोळा करणारॽ वास्तविक ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन माहिती संकलीत केली पाहिजे. मात्र आयोगाचे सदस्य फक्त एका महसूल विभागात जाऊन अवघ्या दोन तासात जर माहिती गोळा करणार असतील तर यातून नेमका कोणता डेटा हाती लागणार? यापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेमलेल्या गायकवाड आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सुनावणी घेत नागरीकांचे म्हणणे जाणून घेतले होते, हे लक्षात घेतले पाहिजे’, असेही विखे पाटील म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- हिंदू-मुस्लिमांच्या संयमाचे कौतुक करणार का? राष्ट्रीय जनमंच पक्षाचा राज ठाकरे यांना सवाल
केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करांमध्ये कपात केली. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील नऊ कोटी लाभार्थींना २०० रुपयांचे अनुदान देऊन पंतप्रधांनी दिलासा दिला. केंद्राच्या निर्णयावर टिका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला काय दिले? हे एकदा तरी सांगावे. सर्वच गोष्टी केंद्राने करायच्या मग तुमचे योगदान कायॽ निर्णय फक्त मुंबई पुरते घेतले. मुंबई सोडून मुख्यमंत्र्यांना जनताच दिसत नाही. केंद्राने आतापर्यत दोनदा पेट्रोल आणि डिझेलवर कर कपात केली. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनीही तसे निर्णय घेऊन जनतेला दिलासा दिला. तुम्ही एकदा तरी करून दाखवा,’ असे थेट आवाहनच विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
क्लिक करा आणि वाचा- राजीव गांधींच्या मृत्युने राहिली गोयकरवाड्याची भेट; गावाचा कायापालट करणाऱ्या पारुबाईंना दिलेलं आश्वासन
क्लिक करा आणि वाचा- जैन धर्मीयांना मांसाहारी ठरविणाऱ्या केंद्रीय अहवालाविरोधात समाज आक्रमक
क्लिक करा आणि वाचा- हिंदू-मुस्लिमांच्या संयमाचे कौतुक करणार का? राष्ट्रीय जनमंच पक्षाचा राज ठाकरे यांना सवाल
केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी केल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले, ‘केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करांमध्ये कपात केली. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील नऊ कोटी लाभार्थींना २०० रुपयांचे अनुदान देऊन पंतप्रधांनी दिलासा दिला. केंद्राच्या निर्णयावर टिका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला काय दिले? हे एकदा तरी सांगावे. सर्वच गोष्टी केंद्राने करायच्या मग तुमचे योगदान कायॽ निर्णय फक्त मुंबई पुरते घेतले. मुंबई सोडून मुख्यमंत्र्यांना जनताच दिसत नाही. केंद्राने आतापर्यत दोनदा पेट्रोल आणि डिझेलवर कर कपात केली. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनीही तसे निर्णय घेऊन जनतेला दिलासा दिला. तुम्ही एकदा तरी करून दाखवा,’ असे थेट आवाहनच विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
क्लिक करा आणि वाचा- राजीव गांधींच्या मृत्युने राहिली गोयकरवाड्याची भेट; गावाचा कायापालट करणाऱ्या पारुबाईंना दिलेलं आश्वासन
क्लिक करा आणि वाचा- जैन धर्मीयांना मांसाहारी ठरविणाऱ्या केंद्रीय अहवालाविरोधात समाज आक्रमक