अ‍ॅपशहर

NCP: राष्ट्रवादीतील घरवापसीवर भाजपच्या नेत्याचे महत्त्वाचे विधान

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपध्ये गेलेले राष्ट्रवादीचे काही आमदार परत येणार असल्याचे विधान केले होते. त्यामुळे अशा संभाव्य नावांवर चर्चा सुरू झाली आहे. अकोलेचे माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांचेही नाव या यादीत घेतले जात होते.

Authored byविजयसिंह होलम | Edited byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Aug 2020, 5:03 pm
म.टा. प्रतिनिधी, नगर: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपध्ये गेलेले राष्ट्रवादीचे काही आमदार परत येणार असल्याचे विधान केले होते. त्यामुळे अशा संभाव्य नावांवर चर्चा सुरू झाली आहे. अकोलेचे माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांचेही नाव या यादीत घेतले जात होते. त्यावर ‘सध्या तरी आपण दिल्या घरी सुखी अहोत’ अशी प्रतिक्रिया वैभव पिचड यांनी दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vaibhav pichad


ज्येष्ठ नेते पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विश्वासू मानले जात होते. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी पुत्र वेभव यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीत वैभव यांचा पराभव झाला. मधल्या काळात पिचडांनी पवारांवर टीकाही केली होती. मात्र, अलीकडेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका केल्यावर पिचड पिता-पुत्रांनी पवारांची बाजू घेतली होती. 'शरद पवारांचं नेतृत्व मोठं आहे. ते कुणीही अमान्य करू शकत नाही,' असं म्हणत पिचड यांनी भाजपच्या पडळकर यांनाच चुकीचे ठरविले होते. या पार्श्वभूमिवर जेव्हा घर वापसीची चर्चा झाली, तेव्हा सहाजिकच पिचड यांचे नावही चर्चेत आले.

वाचाः नवनीत राणा यांना डिस्चार्ज; क्वारंटाइन राहावं लागणार

भंडारदरा धरण भरल्याने त्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी वैभव पिचड यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी यासंबंधी विचारणा केली. त्यावर पिचड म्हणाले, ‘काही वृत्तवाहिन्यांनी घरवापसीसंबंधीच्या बातम्या प्रसारित केल्या. त्यांच्या यादीत ते माझेही नाव घेत होते. मात्र असे काहीही नाही. माझा अद्याप कोणाशीही संपर्क झालेला नाही. सध्या तरी मी दिल्या घरी सुखी आहे, आम्ही राष्ट्रवादीत परत जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचाः शरद पवार यांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह; चार दिवस भेटीगाठी बंद

विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. किरण लहामटे विजयी झालेले आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि त्यानंतरच्या काही काळात पिचडांनी पवारांवर टीका केली होती. तर प्रचाराच्यावेळी स्वत: पवार आणि अजित पवार यांनीही पिचडांवर टीका केली होती. हळूहळू वातावरण बदल गेले. पिचडांनी पवारांवरील टीका तर थांबविलीच उलड पडळकर प्रकरणाच्यावेळी स्वपक्षाची म्हणजे भाजपची नाराजी पत्कारून पवारांची बाजू जाहीरपणे लावून धरली होती. त्यामुळे त्यांच्या घरपावसीची चर्चा असली तरी पिचडांना त्यासाठी स्थानिक पातळीवरील राजकारणाचाही विचार करावा लागणार आहे.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज