म. टा. प्रतिनिधी, नगर
राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविलेल्या भाजपने आता पुढचे लक्ष्य नगर मनपाचे व नगर शहराच्या आमदारकीचे ठेवले आहे. फटाक्यांच्या आतषबाजीसह, ढोल-ताशांच्या गजरात व व पेढेवाटपाने राज्यातील विजयाचा जल्लोष शुक्रवारी नगरमध्ये करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाल्याने फडणवीस व दानवे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत गांधी मैदानातील भाजप कार्यालयात जल्लोष मेळावा झाला. या वेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, श्रीकांत साठे, गौतम दीक्षित, जगन्नाथ निंबाळकर, सुनील पंडित, छाया राजपूत, नितीन शेलार, नगरसेविका मनीषा काळे, भटक्या विमुक्त आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवाजी शेलार आदींसह अन्य उपस्थित होते.
मनपा सत्तेचा निर्धार
खा. गांधी म्हणाले, ‘राजकारणात सगळे दिवस सारखे नसतात, त्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजप आज राज्यात मोठा पक्ष झाला आहे. येत्या दोन वर्षांत नगरमध्ये सर्वत्र भाजप एक क्रमांकाचा पक्ष राहील याचे नियोजन आजपासूनच सुरू केले आहे. भाजपाच्या वातावरणाचा फायदा घेऊन कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांना पक्षाशी जोडावे.’ रामदासी म्हणाले, ‘नगर शहरामध्ये १९८६मध्ये आम्ही ६ नगरसेवक निवडून आल्याचा आजही अभिमान आहे. एकेकाळी भाजपची तिकिटे घेण्यास कार्यकर्ते तयार नव्हते, तोच पक्ष आता देशावर राज्य करत आहे. आता पुढील काळात शहरात भाजपने स्वबळावर निवडणूक लढवाव्यात. नक्कीच महानगरपालिका व शहर विधानसभा जिंकण्याची क्षमता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.’ उपमहापौर छिंदम यांनी ‘भाजपने राज्यात मिळविलेल्या यशाची पुनरावृत्ती नगरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत करण्याकरिता आजपासूनच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी कामाला लागलो आहोत’ असे सांगितले.
जुन्या आठवणींना उजाळा
खा. गांधी यांनी भाजपच्या १९८०पासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्या काळच्या जुन्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. बोटावर मोजण्याएवढ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रभक्तीचे योगदान दिल्याने पक्षाला आज सोन्याचे दिवस पाहता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ताकद वाढल्याचा दावा
नगर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची ताकद वाढल्याचा दावा खा. गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ‘पूर्वी आमच्या असलेल्या सहा जागा आता १४ झाल्या आहेत व पाच पंचायत समित्या ताब्यात आल्या आहेत. पक्षाची ताकद हळूहळू जिल्ह्यात वाढत आहे. आम्ही काँग्रेसमुक्त जिल्हा करणारच आहोत. पुढच्या निवडणुकीत फोर्टी प्लसचे लक्ष्य नक्कीच गाठू’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हिंदूत्वाचा विचार करणारी शिवसेना व काँग्रेस अशी अभद्र युती झाल्याने नगर तालुक्यात पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे ते म्हणाले.
राज्यातील महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविलेल्या भाजपने आता पुढचे लक्ष्य नगर मनपाचे व नगर शहराच्या आमदारकीचे ठेवले आहे. फटाक्यांच्या आतषबाजीसह, ढोल-ताशांच्या गजरात व व पेढेवाटपाने राज्यातील विजयाचा जल्लोष शुक्रवारी नगरमध्ये करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाल्याने फडणवीस व दानवे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत गांधी मैदानातील भाजप कार्यालयात जल्लोष मेळावा झाला. या वेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, श्रीकांत साठे, गौतम दीक्षित, जगन्नाथ निंबाळकर, सुनील पंडित, छाया राजपूत, नितीन शेलार, नगरसेविका मनीषा काळे, भटक्या विमुक्त आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष शिवाजी शेलार आदींसह अन्य उपस्थित होते.
मनपा सत्तेचा निर्धार
खा. गांधी म्हणाले, ‘राजकारणात सगळे दिवस सारखे नसतात, त्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजप आज राज्यात मोठा पक्ष झाला आहे. येत्या दोन वर्षांत नगरमध्ये सर्वत्र भाजप एक क्रमांकाचा पक्ष राहील याचे नियोजन आजपासूनच सुरू केले आहे. भाजपाच्या वातावरणाचा फायदा घेऊन कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांना पक्षाशी जोडावे.’ रामदासी म्हणाले, ‘नगर शहरामध्ये १९८६मध्ये आम्ही ६ नगरसेवक निवडून आल्याचा आजही अभिमान आहे. एकेकाळी भाजपची तिकिटे घेण्यास कार्यकर्ते तयार नव्हते, तोच पक्ष आता देशावर राज्य करत आहे. आता पुढील काळात शहरात भाजपने स्वबळावर निवडणूक लढवाव्यात. नक्कीच महानगरपालिका व शहर विधानसभा जिंकण्याची क्षमता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.’ उपमहापौर छिंदम यांनी ‘भाजपने राज्यात मिळविलेल्या यशाची पुनरावृत्ती नगरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत करण्याकरिता आजपासूनच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी कामाला लागलो आहोत’ असे सांगितले.
जुन्या आठवणींना उजाळा
खा. गांधी यांनी भाजपच्या १९८०पासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्या काळच्या जुन्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. बोटावर मोजण्याएवढ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रभक्तीचे योगदान दिल्याने पक्षाला आज सोन्याचे दिवस पाहता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ताकद वाढल्याचा दावा
नगर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची ताकद वाढल्याचा दावा खा. गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ‘पूर्वी आमच्या असलेल्या सहा जागा आता १४ झाल्या आहेत व पाच पंचायत समित्या ताब्यात आल्या आहेत. पक्षाची ताकद हळूहळू जिल्ह्यात वाढत आहे. आम्ही काँग्रेसमुक्त जिल्हा करणारच आहोत. पुढच्या निवडणुकीत फोर्टी प्लसचे लक्ष्य नक्कीच गाठू’, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हिंदूत्वाचा विचार करणारी शिवसेना व काँग्रेस अशी अभद्र युती झाल्याने नगर तालुक्यात पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे ते म्हणाले.