म. टा. वृत्तसेवा, नेवासा
मुळा लाभ क्षेत्रातील चारही लिफ्ट पाणी योजनांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. योजना बंद करण्याचाही निर्णय झाला आहे. या योजना पुन्हा चालू न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण या योजना सुरू करू, असा इशारा तालुक्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिला आहे.
तालुक्यातील घोडेगांव, पानसवाडी, झापवाडी, मोरेचिंचोरे, मांडेगव्हाण, मोरगव्हाण, आदी गावतील शेतकऱ्यांसाठी या योजना फायदेशीर ठरल्या आहेत. दुष्काळी पट्ट्यातील ही गावे असल्याने या लिफ्ट योजनांमुळे या गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र, खालच्या भागात पाणी जात नसल्याचे कारण देत या योजनाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने यावर अवलंबून असलेल्या लाभधारक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच योजनांचा वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला असून शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे हा निर्णय झाल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. लोकप्रतिनिधींनी राजकीयपेक्षा पालकत्वाची भुमिका निभावून राजधर्माचे पालन करण्याची गरज असताना केवळ राजकीय आकसापोटी असे लोकांना देशोधडीला लावणारे निर्णय घेतले जाणार असतील तर त्याविरोधात संघर्षासाठी रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा सज्जड इशारा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिला आहे.
मुळा लाभ क्षेत्रातील चारही लिफ्ट पाणी योजनांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. योजना बंद करण्याचाही निर्णय झाला आहे. या योजना पुन्हा चालू न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण या योजना सुरू करू, असा इशारा तालुक्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिला आहे.
तालुक्यातील घोडेगांव, पानसवाडी, झापवाडी, मोरेचिंचोरे, मांडेगव्हाण, मोरगव्हाण, आदी गावतील शेतकऱ्यांसाठी या योजना फायदेशीर ठरल्या आहेत. दुष्काळी पट्ट्यातील ही गावे असल्याने या लिफ्ट योजनांमुळे या गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र, खालच्या भागात पाणी जात नसल्याचे कारण देत या योजनाच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने यावर अवलंबून असलेल्या लाभधारक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच योजनांचा वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला असून शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे हा निर्णय झाल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. लोकप्रतिनिधींनी राजकीयपेक्षा पालकत्वाची भुमिका निभावून राजधर्माचे पालन करण्याची गरज असताना केवळ राजकीय आकसापोटी असे लोकांना देशोधडीला लावणारे निर्णय घेतले जाणार असतील तर त्याविरोधात संघर्षासाठी रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा सज्जड इशारा माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिला आहे.