नगर : 'सीएए', 'एनआरसी', 'एनपीआर' हे कायदे हिंदू व मुसलमानांमध्ये फूट पाडण्याकरिता आणले गेले आहेत. जोपर्यंत देशात सुरक्षित, समृद्ध, आनंदी, निरोगी समाज निर्माण होत नाही. तोपर्यंत शाहीन बागचा लढा सुरू ठेवावा लागेल,' असे प्रतिपादन माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केले. नगरमध्ये राज्यघटना बचाव समितीच्या वतीने फकीरवाडा येथे तीन दिवसीय शाहीन बागच्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या धरणे आंदोलनात खोपडे यांचे भाषण झाले. खोपडे म्हणाले, 'ज्या समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. तो समाज प्रगतीपासून वंचित राहतो.' याचे कारण सांगताना त्यांनी भिवंडी दंगलीची उदाहरणे दिली. 'भावी पिढीला सुरक्षित समृद्ध आणि आनंदी समाजाची निर्मिती करण्याकरिता या आंदोलनाचा उपयोग होईल. देशातील 'सीएए' व 'एनआरसी'चा कायदा रद्द करण्यासाठी या देशातील केवळ मुस्लिमच नाही, तर एससी, एसटी, ओबीसी समाजातील बांधव या सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे,' असे ते म्हणाले.
'सीएए', 'एनआरसी' फूट पाडण्याकरिताच'
'सीएए', 'एनआरसी', 'एनपीआर' हे कायदे हिंदू व मुसलमानांमध्ये फूट पाडण्याकरिता आणले गेले आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2020, 4:00 am