म. टा. प्रतिनिधी, शिर्डी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. कोपरगाव शहराला निळवंडे धरणातून बंद पाइपने पाणी देण्यास सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे, अशी घोषणा त्यांनी केली.
नगरपालिका निवडणुकीतील भाजप-सेना युतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी कोपरगावात सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, नगराध्यक्षा एेश्वर्या सातभाई, सभापती सुनील देवकर, सेनेचे उत्तर नगर जिल्हा उपप्रमुख कैलास जाधव, रिपाईंचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, करीम कुरेशी आदी उपस्थित होते. राज्यात २१२ पालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. नगर जिल्ह्यात कोपरगावसह ८ पालिकांच्या निवडणुका येत्या २७ नोव्हेंबर रोजी होत आहेत. भाजप आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली कोपरगाव पालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना, रिपाईं अशी युती करून लढविली जात आहे. त्याच्या विरोधात कर्मवीर शंकर काळे साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवीत आहे, दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरू झाला आहे.
प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला हात घातला. या शहराचाच पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी विधानसभेत प्रश्न मांडला. निळवंडे धरणातून थेट बंद पाइपलाइन टाकून पिण्याचे पाणी आणण्याच्या योजनेला सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारचा निधी मिळतो. तो विकासासाठीच वापरायचा असेल तर भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात पालिकेची सत्ता देऊ नका. राज्यातील सर्व पालिकाची सत्ता आमच्या हाती सोपवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मागील दोन वर्षांत या शहरातील व तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले असल्याचे सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. कोपरगाव शहराला निळवंडे धरणातून बंद पाइपने पाणी देण्यास सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे, अशी घोषणा त्यांनी केली.
नगरपालिका निवडणुकीतील भाजप-सेना युतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी कोपरगावात सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, नगराध्यक्षा एेश्वर्या सातभाई, सभापती सुनील देवकर, सेनेचे उत्तर नगर जिल्हा उपप्रमुख कैलास जाधव, रिपाईंचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष दीपक गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, माजी नगराध्यक्ष दिलीप दारुणकर, करीम कुरेशी आदी उपस्थित होते. राज्यात २१२ पालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. नगर जिल्ह्यात कोपरगावसह ८ पालिकांच्या निवडणुका येत्या २७ नोव्हेंबर रोजी होत आहेत. भाजप आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्त्वाखाली कोपरगाव पालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना, रिपाईं अशी युती करून लढविली जात आहे. त्याच्या विरोधात कर्मवीर शंकर काळे साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवीत आहे, दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरू झाला आहे.
प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाला हात घातला. या शहराचाच पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी विधानसभेत प्रश्न मांडला. निळवंडे धरणातून थेट बंद पाइपलाइन टाकून पिण्याचे पाणी आणण्याच्या योजनेला सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारचा निधी मिळतो. तो विकासासाठीच वापरायचा असेल तर भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात पालिकेची सत्ता देऊ नका. राज्यातील सर्व पालिकाची सत्ता आमच्या हाती सोपवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मागील दोन वर्षांत या शहरातील व तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले असल्याचे सांगितले.