अ‍ॅपशहर

ओबीसींसाठीच्या समर्पित आयोगाची जिल्ह्यांकडे पाठ, आता 'अशी' घेणार माहिती

सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी हिरवा कंदील दिला. पण महाराष्ट्रात मात्र ओबीसींना अद्याप आरक्षण मिळालेलं नाही. आता ओबीसींसाठी नेमलेल्या आयोगाचे दौरे सुरू होत आहेत.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स 20 May 2022, 10:54 am
अहमदनगर : राज्यातील ओबीसींचा इम्पिरिकल डाटा जमा करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने स्थापन केलेला समर्पित आयोग प्रत्येक जिल्ह्यात न जाताना महसूल विभागातूनच माहिती घेणार आहे. मराठा आरक्षणासंबंधी नियुक्त केलेल्या आयोगाचे जिल्हानिहाय दौरे झाले होते. त्यामुळे हा आयोगही जिल्ह्यात येईल, अशी अपेक्षा होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम commission for obc reservation maharashtra
ओबीसींसाठीच्या समर्पित आयोगाची जिल्ह्यांकडे पाठ, विभागस्तरावरूनच माहिती घेणार


शनिवारपासून या आयोगाचा दौरा सुरू होत आहे. पुण्यानंतर रविवारी हा आयोग नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात येणार आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतील ओबीसींना तेथे जाऊन ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका मांडणार्‍या सूचना व निवेदने द्यावी लागणार आहेत.

मध्य प्रदेश सरकारने आधी दिलेला इम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करून इम्पिरिकल डाटा संदर्भातील त्रुटी दूर करून सुधारित अहवाल दिला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य करून मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याची मुभा मध्य प्रदेश सरकारला दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील ओबीसींचा इम्पिरिकल डाटा संकलित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने समर्पित आयोग नेमला आहे. मात्र, याआयोगाचे कामकाज राज्यातील सहा विभागांच्या स्तरावर माहिती संकलनाचे सुरू असल्याचे दिसत आहे. नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद व कोकण या सहाविभागांतर्गत असलेल्या सर्व जिल्ह्यांचे डेटा संकलन तसेच या जिल्ह्यांतील सामाजिकव राजकीय संस्था-संघटनांच्या सूचना व निवेदने विभागीय स्तरावर होणार्‍या दौर्‍याच्यावेळीच संकलित केले जाणार आहे. या दौर्‍यात नागरिकांची व याक्षेत्रात काम करणार्‍या विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांची निवेदने स्वीकारण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात अगेादर नाव नोंदणी करावी लागणार आहे.

ओबीसी आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटलांचा आघाडी सरकारवर निशाणा, म्हणाले...

मराठा आरक्षणाच्यावेळी नेमलेला स्वतंत्र आयोग जसा थेट जिल्ह्यात आला तसे समर्पित आयोगाने जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन माहिती संकलनकेले नसल्याची नाराजी ओबीसींमधून व्यक्त होत आहे.

असा आहे राज्यभर भेटींचा कार्यक्रम

-पुणे विभाग : शनिवार,२१मे, सकाळी ९.३० ते ११.३० विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

-नाशिक विभाग : रविवार २२ मे सायंकाळी ५.३० ते ७.३० विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक

-औरंगाबाद विभाग: रविवार, २२ मे. सकाळी ९.३० ते ११.३० विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद

आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी अण्णा हजारे पुन्हा सज्ज; मुख्यमंत्र्यांबाबत म्हणाले...

-कोकण विभाग : बुधवार, २५ मे. दुपारी २.३० ते ४.३० भागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन

-अमरावती विभाग :शनिवार, २८ मे. सकाळी ९.३० ते ११.३० विभागीय आयुक्त कार्यालय,अमरावती

-नागपूर विभाग : शनिवार २८ मे. सायंकाळी ४.३० ते ६.३० विभागीय आयुक्त कार्यालय,नागपूर
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज