अ‍ॅपशहर

समितीने वास्तव अहवाल द्यावा

शहरातील स्वच्छतेचे सर्वेक्षण हे वास्तवतेला धरुन करण्यात यावे. स्वच्छतेबाबतची परिणामकारक व वास्तव माहिती मिळण्यासाठी स्थानिक सजग नागरिकांच्या मदतीने शहरातील विविध भागांना भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी जागरूक नागरिक मंचाच्या वतीने स्वच्छता सर्वेक्षण करण्यासाठी नगरमध्ये आलेल्या केंद्रीय पथकाकडे करण्यात आली आहे.

Maharashtra Times 22 Jan 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम committee shall in fact report
समितीने वास्तव अहवाल द्यावा

शहरातील स्वच्छतेचे सर्वेक्षण हे वास्तवतेला धरुन करण्यात यावे. स्वच्छतेबाबतची परिणामकारक व वास्तव माहिती मिळण्यासाठी स्थानिक सजग नागरिकांच्या मदतीने शहरातील विविध भागांना भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी जागरूक नागरिक मंचाच्या वतीने स्वच्छता सर्वेक्षण करण्यासाठी नगरमध्ये आलेल्या केंद्रीय पथकाकडे करण्यात आली आहे. याबाबत मंचाचे कार्यवाह सुहास मुळे यांनी पथकातील चारुदत्त पाठक यांची भेट घेऊन चर्चा केली.
शहरातील काटवन खंडोबा रस्ता, गांधीमैदान शौचालय, जुन्या मनपा शेजारील शौचालय, आगरकर मळ्यातील स्व.मीनाताई ठाकरे उद्यान, अशा विविध ठिकाणी केंद्रीय समितीने भेटी द्याव्यात. केंद्रीय समितीने अशा ठिकाणांना भेटी देण्याचे टाळले तर स्वच्छतेचा अहवाल हा वास्तवतेला धरून असणार नाही, असेही मुळे यांनी सांगितले. याशिवाय शहराच्या स्वच्छतेबाबत गुणांकन करताना नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ६०० गुण दिले जाणार आहेत. यामध्ये नागरिकांसोबत फोनद्वारे संपर्क केला जाणार आहे. परंतु बऱ्याच नागरिकांना शहरामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत, याची जाणीव नाही. तर, अनेकांना आपल्या समस्या कशा पद्धतीने मांडणे गरजेचे आहे, हे समजत नाही, असेही मुळे यांनी समितीसमोर स्पष्ट केले. दरम्यान, सुहास मुळे यांनी केंद्रीय समितीला दिलेले निवेदन तातडीने दिल्लीला पाठवण्यात आले आहे. तसेच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही केंद्रीय समितीच्या वतीने देण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज