म. टा. वृत्तसेवा, अकोले
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनागोंदी कारभारामुळे प्रसूतिसाठी आणलेल्या आदिवासी महिलेवर रात्रीच्या वेळी भटकंती करण्याची वेळ आली. प्रसूतिदरम्यान, या महिलेच्या बाळाचा मृत्यू झाला असून महिलेची प्रकृतीदेखील चिंताजनक आहे.
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग असलेल्या घाटघर या गावातील हरकाबाई पांडुरंग खडके या महिलेला रात्री अचानक पोटात दुखू लागल्याने घाटघर येथील उपकेंद्रात आणण्यात आले; मात्र, कोणीही आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने खडके या महिलेला एका खासगी वाहनातून शेंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून एसएमबीटी (कवडदरा ... नाशिक) येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रसूतिदरम्यान त्या आदिवासी महिलेचे बाळ दगावले व महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील रुग्णालयातून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नाशिक येथे हलविण्यास सांगितले; मात्र, आदिवासी कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने व जवळ एक रुपयाही नसल्याने महिलेला पुन्हा भंडारदरा येथे आणण्यात आले व एका खासगी रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती अधिकच चिंताजनक होत गेल्याने त्यांना काही जागरुक नागरिकांच्या व पत्रकारांनी पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात भंडारदरा येथील रुग्णवाहिकेतून तातडीने पाठविले; मात्र, याबाबत घाटघर उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे मोबाइलवरून विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. असे प्रकार या आदिवासी ग्रामीण भागात वेळोवेळी घडत असून रुग्णांची हेळसांड होत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आरोग्य केंद्रांची माहिती घेऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे.
अकोले तालुक्यातील शेंडी (भंडारदरा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणाऱ्या घाटघर या आरोग्य पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घाटघरच्या हरकाबाई पांडुरंग खडके या महिलेला आपले बाळ गमवावे लागले असून तिची तब्येतसुद्धा गंभीर आहे. ही महिला लोणी येथील पीएमटीमध्ये उपचार घेत असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. राजूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांनी याबाबत लक्ष्य वेधले असता याची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले असून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. सुनीता भांगरे यांनी प्रत्यक्ष थेट आरोग्य केंद्रातील प्रकरणाची माहिती घेऊन संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली व या संबंधी दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. यासंबंधी मुख्याधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा यांना फोनवर माहिती देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. अतिदुर्गम आदिवासी उपकेंद्रात रुग्णांची होणारी हेळसांड यामुळे असून अडचण, नसून खोळंबा ठरणाऱ्या उपकेंद्राला टाळे ठोकण्याच्या मनस्थितीत असलेल्या महिलांना सुनीता भांगरे यांनी रोखले. कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचारी हजर राहतील व येथून पुढे आदिवासी रुग्णांची फरफट होणार नाही, अशी ग्वाही त्यानी या वेळी दिली.
आदिवासी भागातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी रुग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी.
- सुनीता भांगरे, जिल्हा परिषद सदस्या, अहमदनगर
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनागोंदी कारभारामुळे प्रसूतिसाठी आणलेल्या आदिवासी महिलेवर रात्रीच्या वेळी भटकंती करण्याची वेळ आली. प्रसूतिदरम्यान, या महिलेच्या बाळाचा मृत्यू झाला असून महिलेची प्रकृतीदेखील चिंताजनक आहे.
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग असलेल्या घाटघर या गावातील हरकाबाई पांडुरंग खडके या महिलेला रात्री अचानक पोटात दुखू लागल्याने घाटघर येथील उपकेंद्रात आणण्यात आले; मात्र, कोणीही आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने खडके या महिलेला एका खासगी वाहनातून शेंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून एसएमबीटी (कवडदरा ... नाशिक) येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रसूतिदरम्यान त्या आदिवासी महिलेचे बाळ दगावले व महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील रुग्णालयातून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नाशिक येथे हलविण्यास सांगितले; मात्र, आदिवासी कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने व जवळ एक रुपयाही नसल्याने महिलेला पुन्हा भंडारदरा येथे आणण्यात आले व एका खासगी रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती अधिकच चिंताजनक होत गेल्याने त्यांना काही जागरुक नागरिकांच्या व पत्रकारांनी पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात भंडारदरा येथील रुग्णवाहिकेतून तातडीने पाठविले; मात्र, याबाबत घाटघर उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे मोबाइलवरून विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. असे प्रकार या आदिवासी ग्रामीण भागात वेळोवेळी घडत असून रुग्णांची हेळसांड होत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. आरोग्य केंद्रांची माहिती घेऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे.
अकोले तालुक्यातील शेंडी (भंडारदरा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणाऱ्या घाटघर या आरोग्य पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घाटघरच्या हरकाबाई पांडुरंग खडके या महिलेला आपले बाळ गमवावे लागले असून तिची तब्येतसुद्धा गंभीर आहे. ही महिला लोणी येथील पीएमटीमध्ये उपचार घेत असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. राजूर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांनी याबाबत लक्ष्य वेधले असता याची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले असून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. सुनीता भांगरे यांनी प्रत्यक्ष थेट आरोग्य केंद्रातील प्रकरणाची माहिती घेऊन संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली व या संबंधी दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. यासंबंधी मुख्याधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा यांना फोनवर माहिती देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. अतिदुर्गम आदिवासी उपकेंद्रात रुग्णांची होणारी हेळसांड यामुळे असून अडचण, नसून खोळंबा ठरणाऱ्या उपकेंद्राला टाळे ठोकण्याच्या मनस्थितीत असलेल्या महिलांना सुनीता भांगरे यांनी रोखले. कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचारी हजर राहतील व येथून पुढे आदिवासी रुग्णांची फरफट होणार नाही, अशी ग्वाही त्यानी या वेळी दिली.
आदिवासी भागातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी रुग्णांची हेळसांड होत आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी.
- सुनीता भांगरे, जिल्हा परिषद सदस्या, अहमदनगर