अ‍ॅपशहर

पालिका कामगारांना हवंय विमा संरक्षण; उपोषणाचा इशारा

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या दीड हजार कामगारांना एक कोटी रुपयांचं विमा संरक्षण देण्याची मागणी मनपा कामगार संघटनेने केली आहे. राज्यातील इतर पालिका कामगारांना एक कोटी रुपयांचं विमा संरक्षण देत असताना अहमदनगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण का नाही? असा सवाल करतानाच विमा संरक्षण न दिल्यास येत्या १७ एप्रिलपासून सेवेत राहून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशाराही कामगार संघटनेने दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Apr 2020, 3:08 pm
नगर: करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या दीड हजार कामगारांना एक कोटी रुपयांचं विमा संरक्षण देण्याची मागणी मनपा कामगार संघटनेने केली आहे. राज्यातील इतर पालिका कामगारांना एक कोटी रुपयांचं विमा संरक्षण देत असताना अहमदनगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण का नाही? असा सवाल करतानाच विमा संरक्षण न दिल्यास येत्या १७ एप्रिलपासून सेवेत राहून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशाराही कामगार संघटनेने दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagar


मनपा कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी हा इशारा दिला आहे. मनपाचे दीड हजार कामगार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. राज्यातील इतर पालिकेचे कर्मचारीही करोना विरोधात लढत आहेत. त्यामुळे त्या त्या पालिकेने कामगारांची काळजीही घेतली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी १ कोटींचे विमा संरक्षणही दिले आहे. तशी योजना नगर पालिकेनेही राबवली पाहिजे. करोनाचा सामना करणाऱ्या कामगारांच्या संरक्षणासाठी अहमदनगर पालिकने पुढाकार घेऊन येत्या दोन दिवसात निर्णय घ्यावा. पालिकेने तसा निर्णय न घेतल्यास १७ एप्रिलपासून सेवेत कार्यरत राहून अन्नत्याग आंदोलन सुरू करू, असा इशारा लोखंडे यांनी दिला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले गेले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मदतकार्याचे 'असे' फोटो काढणं योग्य आहे का?: राज


दरम्यान, राज्यात १२ तासांत १२१ करोना बाधित आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या २४५५वर गेली आहे. यात मुंबईत सर्वाधिक म्हणजे ९२ करोना रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईच्या आसपासच्या परिसरातील नवी मुंबईत १३, ठाण्यात १०, वसई-विरारमध्ये ५ आणि रायगडमध्ये एक रुग्ण आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या १२ तासांत आढळलेले सर्व रुग्ण हे मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातील आहेत. १२ तासांत मुंबई आणि आसपासचा परिसर वगळता इतर ठिकाणच्या रुग्णांची नोंद झाली नाही.

करोना संशयित वृद्धाचा पाय घसरून पडल्यानं मृत्यू

गरिबांसाठी राणेंची 'कमळ थाळी'; तीही मोफत

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज