अ‍ॅपशहर

पाण्याअभावी पिके जळाली

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. टेल टू हेड पाणी वाटपाचे नियोजन असताना उजव्या कालव्यावरील दोन क्रमांकाच्या वितरीकेला पाणी न मिळाल्याने अनेक गावांतील उन्हाळी पिके जळाली आहेत.

Maharashtra Times 19 May 2017, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crop dead
पाण्याअभावी पिके जळाली


मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. टेल टू हेड पाणी वाटपाचे नियोजन असताना उजव्या कालव्यावरील दोन क्रमांकाच्या वितरीकेला पाणी न मिळाल्याने अनेक गावांतील उन्हाळी पिके जळाली आहेत. राजकीय दबावापोटी पाणी सोडले गेले नसल्याचा आरोप करीत शेतकर्यांनी जळालेल्या पिकांसह शहरातील मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात आंदोलन केले. येथील कार्यकारी अभियंत्यास घेराव घातला.

मुळा लाभक्षेत्राच्या उजव्या कालव्यावरील वितरिका क्रमांक २ मध्ये वडुले, आव्हाणे, दिंडेवाडी, ढोरजळगाव, बर्हाणपूर, मळेगाव, गळणवाडी, सामणगाव या गावांना पाणी मिळते. मुळाचे आवर्तन सुरू होऊन महिना होत आला आहे. पाटबंधारे विभागाने पाणी सोडले आहे. परंतु, २ नंबरच्या वितरिकेला जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी या वेळी केला. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, उत्तमराव आहेर आदी सहभागी झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज