जुलैअखेरपर्यंतची मुदत; ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स’चा पुढाकार
म. टा. प्रतिनिधी, नगर
केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेचेही यंदापासून ‘आधार लिंकिंग’ केले गेले आहे. तसेच पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील सहभाग बंधनकारक करण्यात आला असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी मात्र हा सहभाग ऐच्छिक आहे. जिल्ह्यातील सहकारी, सरकारी, खासगी व शेड्युल्ड अशा ३० बँका व त्यांच्या ६७२ शाखांद्वारे पीक विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करवून देण्यात आली आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत हा हप्ता भरण्याची अखेरची मुदत आहे.
शासनाच्या बहुतांश योजनांचे लाभ आता संबंधितांच्या बँक खात्यावरच जमा होत आहे. या प्रक्रियेत मागील वर्षी पीक विमा योजना नव्हती. मात्र, यंदा तिचा समावेश केला गेला आहे. पीक विम्यासाठी आधार लिंक तसेच बँक अकाउंड बंधनकारक केले गेले आहे. ज्यांचे आधार लिंकिंग झालेले नाही, तेही या योजनेंतर्गत करून दिले जाणार आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही हे बंधनकारक असून, त्यांचेही बचत खाते बँक अकाउंट, केवायसी व थम्ब इम्प्रेशन व आधार लिंकिंग केले जाणार आहे. मागच्यावर्षी जिल्ह्यात ३ लाख ७९ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा सहभाग घेतला होता.
प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) नगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यंदा नगर जिल्ह्यासह बीड, नाशिक, पुणे व रत्नागिरी या पाच जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. खरीप हंगामातील विविध पिकांसाठी पीक विमा हप्ता भरण्याची मुदत येत्या ३१ जुलैपर्यंत असल्याने महसूल, सहकार व कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांमध्ये यासंदर्भात जनजागृती मेळावे सुरू आहेत. याशिवाय ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (सीएससी) प्रतिनिधींच्या मदतीनेही पीक विमा अर्ज भरून घेतले जात आहेत.
युनायटेड इन्शुरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अभय चंद्रस, उपव्यवस्थापक शरयू लेले, सहायक व्यवस्थापक मेधा काजळे, वरिष्ठ सहायक बापू भोसले, विकास अधिकारी शिवाजी मोरे आदींनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती येथे दिली. खरीप हंगामातील भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडिद, भूईमूग, सोयाबीन, सूर्यफुल, तीळ या दहा पिकांसाठी २ टक्के तर कापूस व कांदा या दोन नगदी पिकांसाठी ५ टक्के दराने पीक विमा हप्ता भरावा लागणार आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदींमुळे पीक उत्पन्नात येणारी घट, प्रतिकुल हवामान स्थितीमुळे पिकांची पेरणी वा लावणी न झाल्याने होणारे नुकसान, पीक हंगामामध्ये प्रतिकुल हवामानामुळे होणारे पीक नुकसान, पीक काढणीनंतर झालेले नुकसान तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई या विमा योजनेतून दिली जाणार आहे.
पीक विमा घेण्यासाठी आधार कार्ड, सात-बारा उतारा, भाडेपट्टी करार, पीक पेरणी अहवाल तसेच पॅनकार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना वा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र द्यावे लागणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क-९४२२९३१३४८.
म. टा. प्रतिनिधी, नगर
केंद्र सरकारच्या पीक विमा योजनेचेही यंदापासून ‘आधार लिंकिंग’ केले गेले आहे. तसेच पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतील सहभाग बंधनकारक करण्यात आला असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी मात्र हा सहभाग ऐच्छिक आहे. जिल्ह्यातील सहकारी, सरकारी, खासगी व शेड्युल्ड अशा ३० बँका व त्यांच्या ६७२ शाखांद्वारे पीक विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करवून देण्यात आली आहे. येत्या ३१ जुलैपर्यंत हा हप्ता भरण्याची अखेरची मुदत आहे.
शासनाच्या बहुतांश योजनांचे लाभ आता संबंधितांच्या बँक खात्यावरच जमा होत आहे. या प्रक्रियेत मागील वर्षी पीक विमा योजना नव्हती. मात्र, यंदा तिचा समावेश केला गेला आहे. पीक विम्यासाठी आधार लिंक तसेच बँक अकाउंड बंधनकारक केले गेले आहे. ज्यांचे आधार लिंकिंग झालेले नाही, तेही या योजनेंतर्गत करून दिले जाणार आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही हे बंधनकारक असून, त्यांचेही बचत खाते बँक अकाउंट, केवायसी व थम्ब इम्प्रेशन व आधार लिंकिंग केले जाणार आहे. मागच्यावर्षी जिल्ह्यात ३ लाख ७९ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा सहभाग घेतला होता.
प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) नगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यंदा नगर जिल्ह्यासह बीड, नाशिक, पुणे व रत्नागिरी या पाच जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. खरीप हंगामातील विविध पिकांसाठी पीक विमा हप्ता भरण्याची मुदत येत्या ३१ जुलैपर्यंत असल्याने महसूल, सहकार व कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांमध्ये यासंदर्भात जनजागृती मेळावे सुरू आहेत. याशिवाय ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (सीएससी) प्रतिनिधींच्या मदतीनेही पीक विमा अर्ज भरून घेतले जात आहेत.
युनायटेड इन्शुरन्स कंपनीचे विभागीय व्यवस्थापक अभय चंद्रस, उपव्यवस्थापक शरयू लेले, सहायक व्यवस्थापक मेधा काजळे, वरिष्ठ सहायक बापू भोसले, विकास अधिकारी शिवाजी मोरे आदींनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती येथे दिली. खरीप हंगामातील भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडिद, भूईमूग, सोयाबीन, सूर्यफुल, तीळ या दहा पिकांसाठी २ टक्के तर कापूस व कांदा या दोन नगदी पिकांसाठी ५ टक्के दराने पीक विमा हप्ता भरावा लागणार आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदींमुळे पीक उत्पन्नात येणारी घट, प्रतिकुल हवामान स्थितीमुळे पिकांची पेरणी वा लावणी न झाल्याने होणारे नुकसान, पीक हंगामामध्ये प्रतिकुल हवामानामुळे होणारे पीक नुकसान, पीक काढणीनंतर झालेले नुकसान तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई या विमा योजनेतून दिली जाणार आहे.
पीक विमा घेण्यासाठी आधार कार्ड, सात-बारा उतारा, भाडेपट्टी करार, पीक पेरणी अहवाल तसेच पॅनकार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना वा निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र द्यावे लागणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संपर्क-९४२२९३१३४८.