म. टा. प्रतिनिधी, नगर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी सोमवार (२७ नोव्हेंबर) रोजी होणार आहे. जिल्ह्यातील पंधरा उमेदवारांनी ही निवडणूक लढवली असल्याने या निकालाकडे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांसह विद्यार्थ्यांचेही लक्ष लागले आहे.
विद्यापीठाच्या यापूर्वीच्या सिनेटमध्ये जिल्ह्यातील डॉ.राजेंद्र विखे, प्रशांत गडाख, युवराज नरवडे, शिवाजी साबळे, डॉ.अरुण पंधरकर, राजेंद्र चौभे, राजेंद्र काळे, आप्पासाहेब दिघे, ज्योती घोगडे यांचा समावेश होता. विद्यापीठाचा नवीन कायदा आल्यानंतर ऑगस्ट २०१५ पर्यंत हे सिनेट मंडळ बरखास्त झाले होते. आता नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर प्रथमच सिनेट निवडणुका झाल्या असून अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून दहा व व्यवस्थापन गटातून सहा सिनेट निवडून जाणार आहेत.
जिल्ह्यातील एकूण पंधरा उमेदवारांनी ही निवडणूक लढवली आहे. यामध्ये व्यवस्थापन गटातून डॉ. राजेंद्र विखे यांनी तर, पदवीधरांमधून युवराज नरवडे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, अॅड. बापूसाहेब गायके, भारत करडक, राजू पानमंद, अनिल विखे, शिरीष खेताल, सुभाष चिंधे, भाग्यश्री कानडे, मनीषा कमानकर, मनोज तेलोरे, प्रल्हाद बर्डे, संदीप गाढे, अमोल खाडे यांनी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे सोमवारी मतमोजणी झाल्यानंतर जिल्ह्यातील नेमक्या किती उमेदवारांना सिनेटवर संधी मिळते, याबतची उत्सुकता शैक्षणिक वर्तुळात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी सोमवार (२७ नोव्हेंबर) रोजी होणार आहे. जिल्ह्यातील पंधरा उमेदवारांनी ही निवडणूक लढवली असल्याने या निकालाकडे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांसह विद्यार्थ्यांचेही लक्ष लागले आहे.
विद्यापीठाच्या यापूर्वीच्या सिनेटमध्ये जिल्ह्यातील डॉ.राजेंद्र विखे, प्रशांत गडाख, युवराज नरवडे, शिवाजी साबळे, डॉ.अरुण पंधरकर, राजेंद्र चौभे, राजेंद्र काळे, आप्पासाहेब दिघे, ज्योती घोगडे यांचा समावेश होता. विद्यापीठाचा नवीन कायदा आल्यानंतर ऑगस्ट २०१५ पर्यंत हे सिनेट मंडळ बरखास्त झाले होते. आता नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर प्रथमच सिनेट निवडणुका झाल्या असून अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून दहा व व्यवस्थापन गटातून सहा सिनेट निवडून जाणार आहेत.
जिल्ह्यातील एकूण पंधरा उमेदवारांनी ही निवडणूक लढवली आहे. यामध्ये व्यवस्थापन गटातून डॉ. राजेंद्र विखे यांनी तर, पदवीधरांमधून युवराज नरवडे, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, अॅड. बापूसाहेब गायके, भारत करडक, राजू पानमंद, अनिल विखे, शिरीष खेताल, सुभाष चिंधे, भाग्यश्री कानडे, मनीषा कमानकर, मनोज तेलोरे, प्रल्हाद बर्डे, संदीप गाढे, अमोल खाडे यांनी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे सोमवारी मतमोजणी झाल्यानंतर जिल्ह्यातील नेमक्या किती उमेदवारांना सिनेटवर संधी मिळते, याबतची उत्सुकता शैक्षणिक वर्तुळात आहे.