म. टा. वृत्तसेवा, राहुरी
नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी शहरातील रस्त्यावर तातडीने गतीरोधक बसवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी अपघात घडून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, तर काही जणांना कायमचे अपंगत्व आले. अपघातप्रवण ठिकाणी वाहनांच्या वेगाना आवर घालण्यासाठी गतिरोधक बसविणे गरजेचे बनले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता फुलचंद जाधव यांना उपस्थितांनी धारेवर धरत आठ दिवसांमध्ये कार्यवाही झाली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. डिग्रस फाटा, राहुरी बस स्थानक, खरेदी विक्री संघ, स्टेशन चौक, राहुरी महाविद्यालय या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. डिग्रस फाटा येथे झालेल्या अपघातात मारुती झिने यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामी झाले. उपचारासाठी मोठा खर्च करण्याचीही त्यांची परिस्थिती नाही लोकवर्गणी काढून उपचार करावे लागत आहेत, असे असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने अपघातांना आळा बसावा म्हणून गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. रस्त्याच्या कामात लक्ष घालू नका, असे आदेश आहेत का, असा सवाल तनपुरे यांनी केला.
स्टेशन रस्ता नाका नंबर पाच ते पांडुरंग नगर या भागातील रस्ता पूर्णपणे उखडला असून त्याकडे हेतूत: दुर्लक्ष केले जात आहे. मोठी रहदारी असलेल्या भागातील रस्ते खड्डेमय बनले. यामुळे लहानमोठ्या अपघातांना निमंत्रण मिळू लागले आहे. या भागातील रस्ता व गतिरोधकाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जाधव यांनी दिले. नगरसेवक अनिल कासार, अशोक आहेर, सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब उंडे, संजय साळवे, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब खुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राजेंद्र बोरकर, सचिन भिंगारदे, पालिकेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश भुजाडी, विजय करपे, योगेश भिंगारदे, गोरख देशमुख, पांडुरंग उदावंत, गणेश घाडगे, रघुनाथ मुसमाडे, गजानन सातभाई, संदीप ओहळ, डिग्रस ग्रामपंचायतीचे सरपंच पोपट बर्डे यासह नागरिक उपस्थित होते.
नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी शहरातील रस्त्यावर तातडीने गतीरोधक बसवावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी अपघात घडून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, तर काही जणांना कायमचे अपंगत्व आले. अपघातप्रवण ठिकाणी वाहनांच्या वेगाना आवर घालण्यासाठी गतिरोधक बसविणे गरजेचे बनले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता फुलचंद जाधव यांना उपस्थितांनी धारेवर धरत आठ दिवसांमध्ये कार्यवाही झाली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. डिग्रस फाटा, राहुरी बस स्थानक, खरेदी विक्री संघ, स्टेशन चौक, राहुरी महाविद्यालय या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. डिग्रस फाटा येथे झालेल्या अपघातात मारुती झिने यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामी झाले. उपचारासाठी मोठा खर्च करण्याचीही त्यांची परिस्थिती नाही लोकवर्गणी काढून उपचार करावे लागत आहेत, असे असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने अपघातांना आळा बसावा म्हणून गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. रस्त्याच्या कामात लक्ष घालू नका, असे आदेश आहेत का, असा सवाल तनपुरे यांनी केला.
स्टेशन रस्ता नाका नंबर पाच ते पांडुरंग नगर या भागातील रस्ता पूर्णपणे उखडला असून त्याकडे हेतूत: दुर्लक्ष केले जात आहे. मोठी रहदारी असलेल्या भागातील रस्ते खड्डेमय बनले. यामुळे लहानमोठ्या अपघातांना निमंत्रण मिळू लागले आहे. या भागातील रस्ता व गतिरोधकाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जाधव यांनी दिले. नगरसेवक अनिल कासार, अशोक आहेर, सूर्यकांत भुजाडी, नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब उंडे, संजय साळवे, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब खुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राजेंद्र बोरकर, सचिन भिंगारदे, पालिकेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश भुजाडी, विजय करपे, योगेश भिंगारदे, गोरख देशमुख, पांडुरंग उदावंत, गणेश घाडगे, रघुनाथ मुसमाडे, गजानन सातभाई, संदीप ओहळ, डिग्रस ग्रामपंचायतीचे सरपंच पोपट बर्डे यासह नागरिक उपस्थित होते.