अ‍ॅपशहर

खरिपात आठच गावे दुष्काळी

जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरिप हंगामातील गावांची अंतिम पैसेवारी जाहीर केली असून राहुरी तालुक्यातील आठ गावे वगळता उर्वरीत ५७४ गावांची अंतिम पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा जाहीर केली आहे.

Maharashtra Times 17 Dec 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eight villages in droughted in kharip
खरिपात आठच गावे दुष्काळी

जिल्हा प्रशासनाने यंदाच्या खरिप हंगामातील गावांची अंतिम पैसेवारी जाहीर केली असून राहुरी तालुक्यातील आठ गावे वगळता उर्वरीत ५७४ गावांची अंतिम पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा जाहीर केली आहे. खरिप हंगामात चांगला पाऊस झाल्याने शेती उत्पादनातही वाढ झाली. त्याचा परिणाम पैसेवारीतही झाला आहे. जिल्ह्यातील खरिपाच्या एकूण ५८२ गावांपैकी राहुरी तालुक्यातील ८ गावे पन्नास पैशांच्या आत आणि उर्वरीत सर्व गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा जास्त निघाली आहे. त्यामुळे यंदा या आठत गावात टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करावी लागणार आहे.

यंदाच्या खरिप हंगामात चांगला पाऊस झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली होती. धरणेही भरली होती. त्यामुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले. पाण्याची चिंता नसल्याने शेतकऱ्यांनीही पेरण्या केल्या. त्याचा परिणाम खरिपाचे उत्पादन वाढण्यात झाला आहे. खरिपातील पिकांची काढणी झाल्यानंतर महसूल विभागाने केलेल्या पाहणीत राहुरी तालुक्यातीस आठच गावांचे पैसेवारी पन्नास पैशांच्या आत दिसून आली. उर्वरीत गावांतील पिक परिस्थती चांगली असल्याने त्यांच्या पैसेवारीतही सुधारणा झाल्याचे दिसून आली. मागील दोन वर्षातील खरिपात पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या तीनशेच्याही पुढे गेली होती. पिकांना पाणी नसल्याने उत्पादन कमी झाले. तसेच नागरिकांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. यावेळी मात्र निसर्गाने साथ दिल्याने जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती सुधारली आहे.

जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पेरण्या सुरू आहेत. या हंगामातही शेतीसाठी पाण्याची चिंता नाही. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. पुढील काही दिवसात पेरण्यांच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज