अ‍ॅपशहर

‘देशात तरुणांना रोजगार देणारा कायदा हवा’

'जगात भारत हा तरुणांची संख्या जास्त असणारा देश आहे. येथे सुधारित नागरिकत्व कायद्याची गरज नसून रोजगार सुधारणा व रोजगार देणारा कायद्याची आवश्यकता आहे,' असे मत युनूस तांबटकर यांनी ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या जिल्हा अधिवेशनात मांडले.

महाराष्ट्र टाइम्स 10 Feb 2020, 6:55 am
नगर : 'जगात भारत हा तरुणांची संख्या जास्त असणारा देश आहे. येथे सुधारित नागरिकत्व कायद्याची गरज नसून रोजगार सुधारणा व रोजगार देणारा कायद्याची आवश्यकता आहे,' असे मत युनूस तांबटकर यांनी ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या जिल्हा अधिवेशनात मांडले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ‘रोजगार देणारा कायदा हवा’
ऑल इंडिया युथ फेडरेशनचे नगर जिल्ह्याचे अधिवेशन उत्साहात पार पडले.


किसान भवन (बुरुडगाव रोड) येथे यूथ फेडरेशनचे अधिवेशन उत्साहात झाले. या अधिवेशनामध्ये तांबटकर यांनी आपले विचार मांडले. तर, अधिवेशनाचे उद्घाटक डॉ. बापू चंदनशिवे यांनी आपल्या मनोगतामध्ये युवक विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत केले. 'लहान-मोठ्या चळवळी करून आपल्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. समाज माध्यमाचा अभ्यास करून योग्य पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे,' असा सल्लाही चंदनशिवे यांनी दिला. यूथ फेडरेशनची भूमिका नेमकी काय आहे, याबाबत अॅड. सुभाष लांडे यांनी सांगितले.

अधिवेशनात 'सुधारित नागरिकत्व कायदा', 'एनआरसी', 'एनपीआर'यांच्या विरोधात 'हम कागज नही दिखायेंगे' असा ठराव करण्यात आला. आगामी काळात शिक्षण व रोजगार हक्क आंदोलन सुरू करणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नगर उपकेंद्र ताबडतोब कार्यान्वित करावे, या मागणीसाठी आंदोलन करण्याचा ठरावसुद्धा या वेळी घेण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज