म. टा. प्रतिनिधी, नगर
रुग्णालयांच्या पार्किंग जागांमध्ये केलेले बांधकाम स्वतःहून हटविण्याची ग्वाही शहरातील डॉक्टरांनी दिली असल्याने त्यानुसार किती रुग्णालयांनी अशी कार्यवाही केली, याची तपासणी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाद्वारे सोमवारी (१४ ऑगस्ट) होणार आहे. यासाठी स्वतंत्र पथके शहरभर फिरणार आहेत. दरम्यान, मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला रोखण्यासाठी कशापद्धतीने न्यायालयीन लढाई लढावी लागेल, यावर तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी डॉक्टरांची धावपळ सुरू आहे.
नगर शहरातील दीडशेपैकी केवळ दोनच रुग्णालयांनी अधिकृत बांधकाम पूर्णत्व दाखले महापालिकेकडून घेतले असल्याने १४८ बेकायदा रुग्णालयांवर कारवाई होण्यासाठी खंडपीठात जनहित याचिका दाखल आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने पहिल्या टप्प्यात १७ रुग्णालयांच्या पार्किंग जागांवर कारवाई केली आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी ३५ रुग्णालयांवर अशी कारवाई केली जाणार आहे; मात्र, जेसीबी व अन्य यंत्रणा घेऊन येणाऱ्या मनपाच्या पथकामुळे रुग्णालयांतील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये घबराटीचे वातावरण होत असल्याने आम्ही स्वतःहून आमची अतिक्रमणे काढून घेतो, असे डॉक्टरांद्वारे सांगितले गेले आहे. तसे काही डॉक्टरांकडून लिहून घेण्यात आले आहे. यानुसार किती रुग्णालयांनी प्रत्यक्ष कार्यवाही केली, याची तपासणी सोमवारी मनपाद्वारे होणार आहे. खंडपीठाचा आदेश १० ऑगस्टला झाला असल्याने आतापर्यंतच्या चार-पाच दिवसात डॉक्टरांना स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास पुरेसा अवधी मिळाला आहे. त्यामुळे सोमवारी दिवसभर सर्व संबंधित ठिकाणी पाहणी केली जाणार आहे व मंगळवारच्या (१५ ऑगस्ट) सुट्टीनंतर बुधवारपासून (१६ ऑगस्ट) प्रत्यक्ष अतिक्रमण हटाव कारवाई सुरू केली जाणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, न्यायालयाने सुनावणी अंतिम झालेल्या ५२ रुग्णालयांची अतिक्रमणे काढण्याचे आदेश देताना राहिलेल्या ६९ रुग्णालयांबाबतही कार्यवाही करण्याचे सांगितले आहे. ६९ पैकी ४० रुग्णालयांचे अंतिम अहवाल नगररचना विभागाने दिल्याने त्यांना सोमवारी (१४ ऑगस्ट) स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा बजावणे सुरू होणार आहे.
--
चौकट ः
वकिली सल्ला चर्चेत
दोन दिवसांपूर्वी शहरातील डॉक्टरांना महापालिकेच्या पॅनेलवरील एका ज्येष्ठ वकिलाने दिलेला ‘वकिली सल्ला’ सध्या शहरात चर्चेत आहे. खंडपीठाने डॉक्टरांना स्वतंत्र याचिकेद्वारे दाद मागण्याचे सुचवले असल्याने कोणत्या मुद्यावर डॉक्टर अशी याचिका दाखल करू शकतात, याबाबत संबंधित वकिलाने मार्गदर्शन केल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधितांनी या विषयीचे माहिती संकलन सुरू केले असून, खंडपीठासमोर ते मांडले जाणार असल्याचे सांगण्यात येते.
रुग्णालयांच्या पार्किंग जागांमध्ये केलेले बांधकाम स्वतःहून हटविण्याची ग्वाही शहरातील डॉक्टरांनी दिली असल्याने त्यानुसार किती रुग्णालयांनी अशी कार्यवाही केली, याची तपासणी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाद्वारे सोमवारी (१४ ऑगस्ट) होणार आहे. यासाठी स्वतंत्र पथके शहरभर फिरणार आहेत. दरम्यान, मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला रोखण्यासाठी कशापद्धतीने न्यायालयीन लढाई लढावी लागेल, यावर तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी डॉक्टरांची धावपळ सुरू आहे.
नगर शहरातील दीडशेपैकी केवळ दोनच रुग्णालयांनी अधिकृत बांधकाम पूर्णत्व दाखले महापालिकेकडून घेतले असल्याने १४८ बेकायदा रुग्णालयांवर कारवाई होण्यासाठी खंडपीठात जनहित याचिका दाखल आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मनपाने पहिल्या टप्प्यात १७ रुग्णालयांच्या पार्किंग जागांवर कारवाई केली आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी ३५ रुग्णालयांवर अशी कारवाई केली जाणार आहे; मात्र, जेसीबी व अन्य यंत्रणा घेऊन येणाऱ्या मनपाच्या पथकामुळे रुग्णालयांतील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये घबराटीचे वातावरण होत असल्याने आम्ही स्वतःहून आमची अतिक्रमणे काढून घेतो, असे डॉक्टरांद्वारे सांगितले गेले आहे. तसे काही डॉक्टरांकडून लिहून घेण्यात आले आहे. यानुसार किती रुग्णालयांनी प्रत्यक्ष कार्यवाही केली, याची तपासणी सोमवारी मनपाद्वारे होणार आहे. खंडपीठाचा आदेश १० ऑगस्टला झाला असल्याने आतापर्यंतच्या चार-पाच दिवसात डॉक्टरांना स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास पुरेसा अवधी मिळाला आहे. त्यामुळे सोमवारी दिवसभर सर्व संबंधित ठिकाणी पाहणी केली जाणार आहे व मंगळवारच्या (१५ ऑगस्ट) सुट्टीनंतर बुधवारपासून (१६ ऑगस्ट) प्रत्यक्ष अतिक्रमण हटाव कारवाई सुरू केली जाणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, न्यायालयाने सुनावणी अंतिम झालेल्या ५२ रुग्णालयांची अतिक्रमणे काढण्याचे आदेश देताना राहिलेल्या ६९ रुग्णालयांबाबतही कार्यवाही करण्याचे सांगितले आहे. ६९ पैकी ४० रुग्णालयांचे अंतिम अहवाल नगररचना विभागाने दिल्याने त्यांना सोमवारी (१४ ऑगस्ट) स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा बजावणे सुरू होणार आहे.
--
चौकट ः
वकिली सल्ला चर्चेत
दोन दिवसांपूर्वी शहरातील डॉक्टरांना महापालिकेच्या पॅनेलवरील एका ज्येष्ठ वकिलाने दिलेला ‘वकिली सल्ला’ सध्या शहरात चर्चेत आहे. खंडपीठाने डॉक्टरांना स्वतंत्र याचिकेद्वारे दाद मागण्याचे सुचवले असल्याने कोणत्या मुद्यावर डॉक्टर अशी याचिका दाखल करू शकतात, याबाबत संबंधित वकिलाने मार्गदर्शन केल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधितांनी या विषयीचे माहिती संकलन सुरू केले असून, खंडपीठासमोर ते मांडले जाणार असल्याचे सांगण्यात येते.