अ‍ॅपशहर

अण्णांच्या आंदोलनासाठी कोअर कमिटी स्थापन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील नियोजित आंदोलनासाठी राष्ट्रीय कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात २० सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, २५ फेब्रुवारीला दिल्लीत कोअर कमिटीची पहिली बैठक होणार आहे.

Maharashtra Times 18 Feb 2018, 2:08 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम establishment of core committee for anna hajares agitation
अण्णांच्या आंदोलनासाठी कोअर कमिटी स्थापन


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील नियोजित आंदोलनासाठी राष्ट्रीय कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात २० सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, २५ फेब्रुवारीला दिल्लीत कोअर कमिटीची पहिली बैठक होणार आहे. त्यावेळी दुसऱ्या टप्प्यातील नावे जाहीर करण्यात येणार असून, सुमारे ४० ते ४५ सदस्यांची ही समिती आंदोलन हाताळणार आहे.

लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी २३ मार्चला दिल्लीत हे आंदोलन होणार आहे. त्यासाठी कोअर समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी वीस नावे जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातून शिवाजी खेडकर, कल्पना इनामदार यांचा समवेश असून अन्य सदस्य असे - अक्षयकुमार (उडिसा), कमांडर यशवंत प्रकाश (राजस्थान), कर्नल दिनेश नैन (दिल्ली), मनिंद्र जैन (दिल्ली), विक्रम टापरवाडा (राजस्थान), दशरथ कुमार (राजस्थान), करनवीर थमन (पंजाब), प्रवीण भारतीय (उत्तर प्रदेश), सुनील फौजी (उत्तर प्रदेश),गौरवकान्त शर्मा (उत्तर प्रदेश), राकेश रफिक (उत्तर प्रदेश), पी. एन. कल्की (उत्तर प्रदेश), सुशील भट्ट (उत्तराखंड), भोपालसिंह चौधरी (उत्तराखंड), नवीन जयहिंद (हरियाणा), राम नाईक (कर्नाटक), सेरफि फ्लॅगो (अरुणाचल प्रदेश), सुनील लाल (उत्तर प्रदेश).

या समितीची पहिली बैठक २५ फेब्रुवारीला महाराष्ट्र सदनमध्ये होणार आहे. त्यांना रितसर नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देण्यात येणार आहे. भविष्यात राजकारणात जाणार नाही, याचा राजकीय वापर करणार नाही, अशी प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून करून घेण्यात आली आहेत. दिल्लीतील बैठकीत त्यांना आंदोलनातील कामाच्या जबाबदाऱ्या नेमून देण्यात येणार आहेत. याशिवाय आणखी काही जणांचा समितीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

परवानगीची प्रक्रिया सुरू

दिल्लीतील या आंदोलनाला अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यासाठी काही महिन्यांपूर्वीच अर्ज करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी संस्थेशी संपर्क साधून चर्चेसाठी प्रतिनिधी बोलावून घेतले होते. अण्णांच्या दोन प्रतिनिधींनी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. पोलिसांनी मागितलेली आणखी काही माहिती त्यांना देण्यात आली आहे. मात्र, अद्याप परवागी मिळाल्याचे पत्र देण्यात आलेले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज