अ‍ॅपशहर

जागा ३४, अर्ज २७ हजार

तलाठी पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू असून, जिल्ह्यातील ३४ जागांसाठी सुमारे २७ हजार आनलाइन अर्ज दाखल झाले आहेत.

Maharashtra Times 26 Aug 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम exam for talathi
जागा ३४, अर्ज २७ हजार


तलाठी पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू असून, जिल्ह्यातील ३४ जागांसाठी सुमारे २७ हजार आनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारांची परीक्षा घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील ३४ तलाठ्यांची पदे भरण्यात येणार असून, त्यासाठी १२ ते २४ ऑगस्ट दरम्यान आनलाइन अर्जही मागविण्यात आले असून, त्यात नगरमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी २६ हजार ७६४ जणांची आनलाइन अर्ज दाखल केले आहेत. त्यात माजी सैनिक, खेळाडू, अपंग यांचे वेगळे अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याची मुदत संपली असली तरी परीक्षा शुल्क भरण्यासाठी शेवटचा एक दिवस शिल्लक असून, या पदांसाठी ११ सप्टेंबरला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या पदांसाठी मुलाखती घेतल्या जात नाहीत. खुल्या प्रवर्गासाठी १३ जागा असून, या जागांसाठी ९ हजार ८४० अर्ज दाखल झाले आहे. अनुसूचित जातींसाठी ८ जागा आरक्षित असून, त्यासाठी ५ हजार ९८० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. अनुसूचित जातींसाठी ९ जागा आरक्षित असून, या जागांसाठी ४ हजार १९८ अर्ज आले आहेत. तर, ओबीसी प्रवर्गासाठी दोन जागा राखीव असून, त्यासाठी ३ हजार ९१२ अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षांसाठी पूर्वी बारावी ही पात्रता होती. त्यामुळे भरमसाठ अर्ज येऊन परीक्षा घेणे अवघड झाले होते. परंतु, गेल्या दोन वर्षांपूर्वी या तलाठी पदांसाठी पदवी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांतील तलाठी परीक्षा एकाच दिवशी घेण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी नगरसाठी जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. परंतु, या परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार असल्याने प्रशासनावरील परीक्षा घेण्याचा ताण येणार असून, आतापासून केंद्र शोधण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

शहराबाहेर घ्यावी लागणार परीक्षा

सरकारी विभागाच्या वेगवेगळ्या परीक्षा नगर शहरातील शाळा, महाविद्यालयातील केंद्राममध्ये घेण्यात येतात. एका वेळी १५ हजार उमेदवारांची परीक्षेला बसण्याची व्यवस्था आहे. तलाठी पदांसाठी जास्त उमेदवार असल्याने तालुक्याच्या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी जास्त नियुक्त केले जाणार आहेत. तसेच, गैरप्रकार होऊ नयेत म्हणून पथके नेमावी लागणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज