अ‍ॅपशहर

संगमनेरकरांना टोलमधून सूट; युवकांना नोकऱ्या

तालुक्याच्या वैभावात भर टाकणाऱ्या नाशिक-पुणे चौपदरीकरण झालेल्या महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर संगमनेर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमधून सूट देण्यात आली आहे.

Maharashtra Times 21 Feb 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम exeption in toll for sangamner villegers
संगमनेरकरांना टोलमधून सूट; युवकांना नोकऱ्या


तालुक्याच्या वैभावात भर टाकणाऱ्या नाशिक-पुणे चौपदरीकरण झालेल्या महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर संगमनेर तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. या टोलनाक्यावर ७० टक्के स्थानिक युवकांना नोकऱ्या मिळणार आहेत. युवा नेते सत्यजित तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या युवक काँग्रेसच्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला.

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर हिवरगाव पावसा येथील नव्याने सुरू झालेल्या टोल नाक्यामधून सर्व स्थानिक वाहनांना सूट द्या, अशा मागणीसह स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्त्वाखाली युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने टोल नाक्यावर ३ तास आंदोलन करण्यात आले. या वेळी शिर्डी लोकसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अजय फटांगरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमेश्वर दिवटे, एनएसयूआयचे निखिल पापडेजा, नितीन अभंग, शैलेश कंलत्री, रमेश नेहे, नूर महंमद, अमोल खताळ, संतोष मांडेकर, विजय राहाणे आदी उपस्थित होते. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी या चौपदरीकरण रस्त्यासाठी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. आता नाशिक-पुणे चौपदरी रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या टोलनाक्यावरून स्थानिक नागरिकांच्या सर्व वाहनांना सूट मिळावी, तसेच उर्वरित काम तातडीने पूर्ण करून या टोलनाक्यावर स्थानिक युवकांना नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन सुरू होते.

सत्यजित तांबे म्हणाले, टोल नाक्यावर स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. याचबरोबर भूसंपादन झालेल्या जमिनीतील सर्व प्रकरच्या रकमा त्वरित मिळाव्यात, अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे, तालुक्यातील सर्व सर्व्हिस रोड लवकराच लवकर पूर्ण करावेत, अशा मागण्या त्यांनी केल्या. यावर टोल व्यवस्थापनाने स्थानिक वाहनांना टोल मुक्त करत ७० टक्के नोकऱ्या स्थानिक युवकांना देण्याचे मान्य केले. वाहनधारकांना टोल नाक्यावर आधार कार्डसह तालुक्यातील रहिवासी असल्याचा पुरावा अनिवार्य आहे. अक्षय दिघे, रमेश दिघे, विश्वास निसाळ, सचिन खेमनर, अभिजित गाडे, गौरव डोंगरे, आंबादास आडेप, योगेश गाढे आदी उपस्थित होते. या वेळी १ तास रास्ता रोको करण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज