म. टा. प्रतिनिधी, नगर
सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जात असलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी आता जिल्ह्याला सरकारकडून येणाऱ्या नव्या पैशांची प्रतीक्षा आहे. सरकारने आतापर्यंत पाठवलेल्या ४७० कोटी रुपयांपैकी ४६७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जखाती जमा केले गेले आहेत. १ लाख ६६ हजार ७६१ शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.
मागील जुलै महिन्यापासून शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. ती आता अंतिम टप्प्यात आहे. सरकारने शेतकऱ्यांकडून मागवलेले ऑनलाइन अर्ज तसेच गटसचिवांकडून भरून घेतलेल्या ६६ मुद्यांच्या माहितीची तपासणी जिल्हा बँक स्तरावरच झाली असून, बँकेने पाठवलेल्या याद्यांची पुन्हा राज्यस्तरावर तपासणी होऊन त्या अंतिम केल्या जात आहेत. या अंतिम याद्यांतील शेतकऱ्यांच्या कर्जखाती बँकेकडून कर्ज थकित रकमा जमा दाखवल्या जात आहेत. आतापर्यंत ७६ हजार ६६२ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर प्रत्येकी दीड लाखाप्रमाणे ३३४ कोटी रुपये जमा झाले आहेत. तर प्रामाणिक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कमीत कमी १५ हजार ते जास्तीत जास्त २५ हजारांपर्यंतच्या प्रोत्साहन अनुदान योजनेत आतापर्यंत ९० हजार ९९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३२ कोटी रुपये जमा केले गेले आहे. या दोन्ही संख्या मिळून १ लाख ६६ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या खात्यात ४६७ कोटी रुपये जमा झाले आहेत.
शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर झाल्यावर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३ लाख ७४ हजार शेतकऱ्यांना या माफीचा लाभ मिळण्याचा प्राथमिक अंदाज होता. यात जिल्हा सहकारी बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीय बँकांच्या पीक कर्ज खात्यांचा समावेश होता. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचीच संख्या सर्वाधिक २ लाख ५२ हजार होती. यापैकी सरकारने आतापर्यंत २ लाख ४२ हजार ४९९ शेतकऱ्यांची यादी अंतिम केली आहे. या यादीची बँकेद्वारे पुन्हा तपासणी होऊन यापैकी १ लाख ६७ हजार ७६१ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ दिला गेला आहे.
सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दिल्या जात असलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी आता जिल्ह्याला सरकारकडून येणाऱ्या नव्या पैशांची प्रतीक्षा आहे. सरकारने आतापर्यंत पाठवलेल्या ४७० कोटी रुपयांपैकी ४६७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जखाती जमा केले गेले आहेत. १ लाख ६६ हजार ७६१ शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.
मागील जुलै महिन्यापासून शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. ती आता अंतिम टप्प्यात आहे. सरकारने शेतकऱ्यांकडून मागवलेले ऑनलाइन अर्ज तसेच गटसचिवांकडून भरून घेतलेल्या ६६ मुद्यांच्या माहितीची तपासणी जिल्हा बँक स्तरावरच झाली असून, बँकेने पाठवलेल्या याद्यांची पुन्हा राज्यस्तरावर तपासणी होऊन त्या अंतिम केल्या जात आहेत. या अंतिम याद्यांतील शेतकऱ्यांच्या कर्जखाती बँकेकडून कर्ज थकित रकमा जमा दाखवल्या जात आहेत. आतापर्यंत ७६ हजार ६६२ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर प्रत्येकी दीड लाखाप्रमाणे ३३४ कोटी रुपये जमा झाले आहेत. तर प्रामाणिक परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कमीत कमी १५ हजार ते जास्तीत जास्त २५ हजारांपर्यंतच्या प्रोत्साहन अनुदान योजनेत आतापर्यंत ९० हजार ९९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १३२ कोटी रुपये जमा केले गेले आहे. या दोन्ही संख्या मिळून १ लाख ६६ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या खात्यात ४६७ कोटी रुपये जमा झाले आहेत.
शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर झाल्यावर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३ लाख ७४ हजार शेतकऱ्यांना या माफीचा लाभ मिळण्याचा प्राथमिक अंदाज होता. यात जिल्हा सहकारी बँकेसह जिल्ह्यातील राष्ट्रीय बँकांच्या पीक कर्ज खात्यांचा समावेश होता. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचीच संख्या सर्वाधिक २ लाख ५२ हजार होती. यापैकी सरकारने आतापर्यंत २ लाख ४२ हजार ४९९ शेतकऱ्यांची यादी अंतिम केली आहे. या यादीची बँकेद्वारे पुन्हा तपासणी होऊन यापैकी १ लाख ६७ हजार ७६१ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ दिला गेला आहे.