अ‍ॅपशहर

शेतकऱ्यानं डाळिंबाच्या बागेवर फिरवला जेसीबी

राहाता तालुक्यातील केलवड गावातील सुभाष चांगदेव वाघे या शेतकऱ्याने आपल्या पावणे दोन एकर डाळिंबाच्या बागेवर जेसीबी चालवून बाग नष्ट केल्याची घटना घडली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2019, 3:36 pm
अहमदनगर -
महाराष्ट्र टाइम्स.कॉम WhatsApp Image 2019-05-15 at 3.06.51 PM.


राहाता तालुक्यातील केलवड गावातील सुभाष चांगदेव वाघे या शेतकऱ्याने आपल्या पावणे दोन एकर डाळिंबाच्या बागेवर जेसीबी चालवून बाग नष्ट केल्याची घटना घडली आहे.

या वर्षी पाऊस न झाल्यामुळे त्यांनी टँकरने पाणी आणून बाग जगविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आतापर्यंत साठ हजार रुपये खर्च झाले. मात्र, यापुढे खर्च करू शकत नाही आणि पुढे उत्पन्नाची हमीही नाही, त्यामुळे त्यांनी बागच काढून टाकण्याचा निर्णय घेत उभ्या झाडांवर जेसीबी चालविला. सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांना बागेच्या नुकसानीची भरपाईही मिळू शकलेली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज