म.टा.प्रतिनिधी,शिर्डी
ऊसदरवाढीसाठी राज्यातील १२ शेतकरी संघटनांनी गुरुवारपासून लोणी येथे आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलनाला परवानी नाकारणाऱ्या लोणी ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यातच ठिय्या मांडून बेमुदत जोरदार आंदोलन सुरू केले.
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून प्रती टन ३५०० रुपये द्यावेत, वजनातील चोरी रोखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बंधनकारक करावेत या व इतर प्रमुख मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात १२ शेतकरी संघटनांनी एकत्र होत पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते व शेतकरी वििवध भागातून लोणी गावात सकाळीच दाखल झाले. जिल्हा प्रशासनाची परवानगी नसल्याने बंदोबस्त वाढविण्यात आला. आंदोलकांचे नेते कॉम्रेड डॉ.अजित नवले यांनी लोणी बसस्थानकात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर विखे पाटील यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केले.
लोणी ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने आंदोलनास विरोध केला आणि पुतळ्यासमोर हातगाड्या उभ्या करून मोकळी जागा अडवली. तेथे पाणी ओतून चिखल करण्यात आला. मंडपवाल्याला हुसकावून लावण्यात आले. अशा पद्धतीने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलन चिरडण्यासाठी दडपशाही केली असा आरोप नवले व कॉम्रेड बन्सी सातपुते यांनी केला. नवलेंसह २३ जणांनी प्रत्यक्ष आत्म्क्लेश सुरू केला असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी ५० शेतकरी कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत.
विखे-पाटलांची भूमिका
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी गेली तीन वर्ष संघर्ष करीत आहे. विरोधी पक्षनेता म्हणून भाजप सरकारची सतत कोंडी करीत आहे. आत्मक्लेश आंदोलनाला माझा विरोध नाही. आंदोलन दडपण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. गावातील कोणताही नागरिक विरोध करणार नाही. त्यामुळे गावात पोलिस कुमक पाठवायची नाही अशा सूचना मी दिल्या आहेत. उत्पादक शेतकरी व साखर कारखाने या दोन्हीसाठी लाभदायक असणारे साखरेचे धोरण केंद्र सरकारने आणले पाहिजे. खासगी साखर कारखाच्या वाढत्या शिरकावामुळे सहकारी साखर कारखान्याकडे सरकारचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. साखर कारखान्यांना सरकारने मदतीचे विशेष पकेज दिले पाहिजे,’ अशी भूमिका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडली.
ऊसदरवाढीसाठी राज्यातील १२ शेतकरी संघटनांनी गुरुवारपासून लोणी येथे आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलनाला परवानी नाकारणाऱ्या लोणी ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यातच ठिय्या मांडून बेमुदत जोरदार आंदोलन सुरू केले.
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून प्रती टन ३५०० रुपये द्यावेत, वजनातील चोरी रोखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बंधनकारक करावेत या व इतर प्रमुख मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात १२ शेतकरी संघटनांनी एकत्र होत पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते व शेतकरी वििवध भागातून लोणी गावात सकाळीच दाखल झाले. जिल्हा प्रशासनाची परवानगी नसल्याने बंदोबस्त वाढविण्यात आला. आंदोलकांचे नेते कॉम्रेड डॉ.अजित नवले यांनी लोणी बसस्थानकात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर विखे पाटील यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरू केले.
लोणी ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने आंदोलनास विरोध केला आणि पुतळ्यासमोर हातगाड्या उभ्या करून मोकळी जागा अडवली. तेथे पाणी ओतून चिखल करण्यात आला. मंडपवाल्याला हुसकावून लावण्यात आले. अशा पद्धतीने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलन चिरडण्यासाठी दडपशाही केली असा आरोप नवले व कॉम्रेड बन्सी सातपुते यांनी केला. नवलेंसह २३ जणांनी प्रत्यक्ष आत्म्क्लेश सुरू केला असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी ५० शेतकरी कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत.
विखे-पाटलांची भूमिका
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी गेली तीन वर्ष संघर्ष करीत आहे. विरोधी पक्षनेता म्हणून भाजप सरकारची सतत कोंडी करीत आहे. आत्मक्लेश आंदोलनाला माझा विरोध नाही. आंदोलन दडपण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. गावातील कोणताही नागरिक विरोध करणार नाही. त्यामुळे गावात पोलिस कुमक पाठवायची नाही अशा सूचना मी दिल्या आहेत. उत्पादक शेतकरी व साखर कारखाने या दोन्हीसाठी लाभदायक असणारे साखरेचे धोरण केंद्र सरकारने आणले पाहिजे. खासगी साखर कारखाच्या वाढत्या शिरकावामुळे सहकारी साखर कारखान्याकडे सरकारचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. साखर कारखान्यांना सरकारने मदतीचे विशेष पकेज दिले पाहिजे,’ अशी भूमिका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडली.