म. टा. प्रतिनिधी, नगर
लोकसंख्येच्या तुलनेत शहरात स्वच्छतागृहांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे नवी स्वच्छतागृह बांधण्याची गरज असून त्यासाठी जागा शोधल्या पाहिजेत. त्यासोबतच सध्याच्या स्वच्छतागृहांचीही योग्य ती दुरुस्ती देखभाल करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी येथील इंद्रायणी प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.
यासंबंधी ‘मटा’शी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश चिपाडे म्हणाले की, शहरात पुरेशी स्वच्छतागृहे हवीत; मात्र, याकडे आजवर दुर्लक्ष होत आले आहे. जी जुनी स्वच्छतागृहे आहेत, त्यांचीही अवस्था वाईट झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या कार्यालयातील स्वच्छतागृहेसुद्धा स्वच्छ म्हणायच्या लायकीची नाहीत. तळमजल्यावरील या स्वच्छतागृहात प्रचंड घाण साचली आहे. भांडी खराब झाली आहेत, कोपऱ्यांत आणि भिंतींवर पान-तंबाखुचे डाग आहेत. आत प्रवेश करताच दुर्गंधी येते. त्यामुळे येथे जाताना नाक मुठीत धरून जावे लागते. शहरातील अन्य स्वच्छतागृहांची दुरुस्ती देखभाल दूरच; महापालिका स्वतःच्या कार्यालयातील स्वच्छतागृहही स्वच्छ ठेवू शकत नाही, यावरून या प्रश्नाचे मनपाला किती गांभीर्य आहे हे लक्षात येते. बालिकाश्रम रस्ता नव्याने झाला आहे. त्यावर काही ठिकाणी स्वच्छतागृह उभारता येतील, अशा जागा आहेत. याशिवाय सावेडीतून शहरात जाताना न्यू आर्ट्स कॉलेजजवळ सोडले तर संपूर्ण रस्त्यावर दुसरे स्वच्छतागृह नाही. या रस्त्यावरही जागा उपलब्ध होऊ शकते. मात्र, त्यासाठी महापालिकेची मनसिकता आवश्यक आहे. आम्ही लवकरच आयुक्तांना भेटून यासंबंधी चर्चा करणार आहोत.'
महापालिकेची नवीन इमारत झाली, त्या वेळी तेथे स्वच्छतागृह बांधण्यात आलेली आहेत. त्याचा वापर प्रामुख्याने महापालिका कर्मचारी आणि तेथे कामासाठी येणारे नागरिक करतात. साफसाईची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांवरच आहे; मात्र, सध्या ही स्वच्छतागृहे खूपच घाण झाली आहेत. शहरात स्वच्छता अभियानासारखे उपक्रम राबविणारी यंत्रणा, नागरिकांना उपदेशाचे डोस पाजणारी यंत्रणा स्वतःच्या जागेतील स्वच्छतागृह मात्र, स्वच्छ ठेवू शकत नाही, असा विरोधाभास येथे पहायला मिळतो.
चौकट ः
नागरिकांचीही उदासीनता
शहरात स्वच्छतागृहांची दुरवस्था होण्यास नागरिकांची उदासीनताही तेवढीच कारणीभूत असल्याचे लक्षात येते. स्वच्छतागृहात घाण करण्यास नागरिकांची बेफिकीर वृत्ती कारणीभूत ठरते. त्यांची वेळेवर सफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे आपल्या भागात स्वच्छतागृह नको, अशी मागणी होते. अनेक ठिकाणी रात्रीतून स्वच्छतागृह पाडून टाकल्याची उदाहारणे आहेत. त्यामुळे वापर करणारे नागरिक आणि परिसरातील नागरिक यांचीही मानसिकता बदलाचे आव्हान आहे.
कोट ः
स्वच्छतागृहाची उपलब्धता हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि ते पुरविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. केवळ जागा नाही, म्हणून टाळाटाळ करण्यापेक्षा यासाठी जागा शोधल्या पाहिजेत. अशा काही जागा आम्ही महापालिकेला दाखवून देणार आहोत.
- डॉ. योगेश चिपाडे, इंद्रायणी प्रतिष्ठान ट्रस्ट
लोकसंख्येच्या तुलनेत शहरात स्वच्छतागृहांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे नवी स्वच्छतागृह बांधण्याची गरज असून त्यासाठी जागा शोधल्या पाहिजेत. त्यासोबतच सध्याच्या स्वच्छतागृहांचीही योग्य ती दुरुस्ती देखभाल करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी येथील इंद्रायणी प्रतिष्ठान ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.
यासंबंधी ‘मटा’शी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश चिपाडे म्हणाले की, शहरात पुरेशी स्वच्छतागृहे हवीत; मात्र, याकडे आजवर दुर्लक्ष होत आले आहे. जी जुनी स्वच्छतागृहे आहेत, त्यांचीही अवस्था वाईट झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या कार्यालयातील स्वच्छतागृहेसुद्धा स्वच्छ म्हणायच्या लायकीची नाहीत. तळमजल्यावरील या स्वच्छतागृहात प्रचंड घाण साचली आहे. भांडी खराब झाली आहेत, कोपऱ्यांत आणि भिंतींवर पान-तंबाखुचे डाग आहेत. आत प्रवेश करताच दुर्गंधी येते. त्यामुळे येथे जाताना नाक मुठीत धरून जावे लागते. शहरातील अन्य स्वच्छतागृहांची दुरुस्ती देखभाल दूरच; महापालिका स्वतःच्या कार्यालयातील स्वच्छतागृहही स्वच्छ ठेवू शकत नाही, यावरून या प्रश्नाचे मनपाला किती गांभीर्य आहे हे लक्षात येते. बालिकाश्रम रस्ता नव्याने झाला आहे. त्यावर काही ठिकाणी स्वच्छतागृह उभारता येतील, अशा जागा आहेत. याशिवाय सावेडीतून शहरात जाताना न्यू आर्ट्स कॉलेजजवळ सोडले तर संपूर्ण रस्त्यावर दुसरे स्वच्छतागृह नाही. या रस्त्यावरही जागा उपलब्ध होऊ शकते. मात्र, त्यासाठी महापालिकेची मनसिकता आवश्यक आहे. आम्ही लवकरच आयुक्तांना भेटून यासंबंधी चर्चा करणार आहोत.'
महापालिकेची नवीन इमारत झाली, त्या वेळी तेथे स्वच्छतागृह बांधण्यात आलेली आहेत. त्याचा वापर प्रामुख्याने महापालिका कर्मचारी आणि तेथे कामासाठी येणारे नागरिक करतात. साफसाईची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांवरच आहे; मात्र, सध्या ही स्वच्छतागृहे खूपच घाण झाली आहेत. शहरात स्वच्छता अभियानासारखे उपक्रम राबविणारी यंत्रणा, नागरिकांना उपदेशाचे डोस पाजणारी यंत्रणा स्वतःच्या जागेतील स्वच्छतागृह मात्र, स्वच्छ ठेवू शकत नाही, असा विरोधाभास येथे पहायला मिळतो.
चौकट ः
नागरिकांचीही उदासीनता
शहरात स्वच्छतागृहांची दुरवस्था होण्यास नागरिकांची उदासीनताही तेवढीच कारणीभूत असल्याचे लक्षात येते. स्वच्छतागृहात घाण करण्यास नागरिकांची बेफिकीर वृत्ती कारणीभूत ठरते. त्यांची वेळेवर सफाई होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे आपल्या भागात स्वच्छतागृह नको, अशी मागणी होते. अनेक ठिकाणी रात्रीतून स्वच्छतागृह पाडून टाकल्याची उदाहारणे आहेत. त्यामुळे वापर करणारे नागरिक आणि परिसरातील नागरिक यांचीही मानसिकता बदलाचे आव्हान आहे.
कोट ः
स्वच्छतागृहाची उपलब्धता हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे आणि ते पुरविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. केवळ जागा नाही, म्हणून टाळाटाळ करण्यापेक्षा यासाठी जागा शोधल्या पाहिजेत. अशा काही जागा आम्ही महापालिकेला दाखवून देणार आहोत.
- डॉ. योगेश चिपाडे, इंद्रायणी प्रतिष्ठान ट्रस्ट