अ‍ॅपशहर

धुक्यामुळे पाच दिवस शिर्डी विमानसेवा ठप्प

शिर्डी विमानतळ परिसरातून धुके हटत नसल्याने मागील पाच दिवसांपासून विमानसेवा ठप्पच आहे. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, कोलकाता, इंदूर या शहरांतून रोज २८ विमानांमधून साईबाबा मंदिराच्या दर्शनास येणाऱ्या दोन हजार प्रवाशांना त्याचा फटका बसतो आहे.

महाराष्ट्र टाइम्स 18 Nov 2019, 9:05 pm
रोज दोन हजार प्रवाशांना फटका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shirdi-flight service disturb


म. टा. वृत्तसेवा, शिर्डी

शिर्डी विमानतळ परिसरातून धुके हटत नसल्याने मागील पाच दिवसांपासून विमानसेवा ठप्पच आहे. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, कोलकाता, इंदूर या शहरांतून रोज २८ विमानांमधून साईबाबा मंदिराच्या दर्शनास येणाऱ्या दोन हजार प्रवाशांना त्याचा फटका बसतो आहे.

शिर्डी विमानतळ परिसरात मागील गुरुवारपासून धुक्याचा मुक्काम वाढल्याने त्याचा मोठा फटका दहा हजार प्रवाशांना बसला आहे. शिर्डीतच सातत्याने हवामान खराब का होते, या विषयी विमानतळ आणि विमान कंपन्याच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. विमानतळाच्या किमान पाच किलोमीटर परिसरात हवामान स्वच्छ असेल, तरच विमानांना उतरण्यास आणि उड्डाणास परवानगी दिली जाते. मागील पाच दिवसांपासून दृश्यमानता तीन ते साडेतीन किलोमीटरच्या पुढे सरकत नसल्याने सेवा ठप्प झाली आहे.

'या विमानतळावर रोज एक हजार प्रवाशी येतात आणि तेवढेच परत जातात; परंतु खराब हवामानामुळे मागील पाच दिवसांपासून विमानसेवा ठप्प पडली आहे,' अशी माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्री यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज