अहमदनगर: 'अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केलेला पालकमंत्र्यांचा दौरा हा केवळ दाखवण्यासाठी व त्यांच्या श्रेष्ठींना माहिती होण्यासाठी असतो, तो कामासाठी नसतो,' असा घणाघात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केला आहे. 'शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने जी दहा हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे, ती फसवी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
वाचा: अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात; खडसेंच्या प्रश्नावर 'या' नेत्याचा टोला
पाचपुते हे आज नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. तसेच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मात्र पाचपुते यांनी मुश्रीफ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड हे देखील उपस्थित होते. ते म्हणाले, 'जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा दौरा हा दाखवण्यासाठी व त्यांच्या श्रेष्टींना माहिती होण्यासाठी असतो. तो कामासाठी नसतो. त्यामुळे त्यावर जास्त बोलणे योग्य नाही. पण राज्य सरकारने जी दहा हजार कोटीची मदत सांगितले आहे, ही घोषणा फसवी आहेे. हेक्टरी दहा हजार रुपये देणे पुरेसे नाही. त्यामुळे ही घोषणा मोठी नसून गरजेपुरती सुद्धा नाहीये. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होतात की नाही, हे सुद्धा यांना माहिती नाही. त्यामुळे सरसकट मदत देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाचा: का खेळखंडोबा करता?; मराठा आरक्षणावरून संभाजीराजेंचा सवाल
दरम्यान, पाचपुते यांनी आज जिल्हाधिकारी भोसले यांना पुस्तक भेट दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताना मला बुके ऐवजी बुक द्या असे आवाहन केले होते. त्यानुसारच हे पुस्तक त्यांना दिले असल्याचे पाचपुते यांनी सांगितले.
वाचा: अण्णा हजारे यांच्याबद्दल 'ही' बातमी कोणी पसरवली? कार्यकर्ते म्हणतात...
वाचा: अशा गोष्टी मनावर घ्यायच्या नसतात; खडसेंच्या प्रश्नावर 'या' नेत्याचा टोला
पाचपुते हे आज नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. तसेच जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मात्र पाचपुते यांनी मुश्रीफ यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड हे देखील उपस्थित होते. ते म्हणाले, 'जिल्ह्यात पालकमंत्र्यांचा दौरा हा दाखवण्यासाठी व त्यांच्या श्रेष्टींना माहिती होण्यासाठी असतो. तो कामासाठी नसतो. त्यामुळे त्यावर जास्त बोलणे योग्य नाही. पण राज्य सरकारने जी दहा हजार कोटीची मदत सांगितले आहे, ही घोषणा फसवी आहेे. हेक्टरी दहा हजार रुपये देणे पुरेसे नाही. त्यामुळे ही घोषणा मोठी नसून गरजेपुरती सुद्धा नाहीये. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होतात की नाही, हे सुद्धा यांना माहिती नाही. त्यामुळे सरसकट मदत देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वाचा: का खेळखंडोबा करता?; मराठा आरक्षणावरून संभाजीराजेंचा सवाल
दरम्यान, पाचपुते यांनी आज जिल्हाधिकारी भोसले यांना पुस्तक भेट दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताना मला बुके ऐवजी बुक द्या असे आवाहन केले होते. त्यानुसारच हे पुस्तक त्यांना दिले असल्याचे पाचपुते यांनी सांगितले.
वाचा: अण्णा हजारे यांच्याबद्दल 'ही' बातमी कोणी पसरवली? कार्यकर्ते म्हणतात...