अहमदनगर: 'पुरोगामी महाराष्ट्रात राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भाषा अर्वाच्य व जनतेमध्ये भीती निर्माण करणारी आहे,' असा घणाघात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. 'कुठलाही विकासाचा दृष्टीकोन न ठेवता जनतेला दमदाटी व दमबाजी करणारे सरकार राज्यात आहे,' असा आरोपही त्यांनी केला असून,'हे सरकार फार काळ टिकणार नसून लवकरच पडेल,' असा दावाही प्रा. शिंदे यांनी केला.
वाचा: ...म्हणून मी आज हिरो ठरले; कंगनाचा टीकाकारांना टोला
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर माजी मंत्री प्रा. शिंदे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. शिंदे म्हणाले, 'या सरकारचा एक वर्षाचा आढावा घेतला, तर अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. करोना आपत्ती आली. अतिवृष्टी झाली. शेतकरी अडचणीत आला. पाणी आहे तर वीज नाही. वाढीव वीज बिले आली. कुठलीही दूरदृष्टी नसलेले सरकार राज्यात आरूढ आहे,' अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
वाचा: 'एखाद्यानं मूर्खपणा केला म्हणून सरकारनं कायद्याची चौकट मोडू नये'
'राज्यातील सरकार म्हणजे महाराष्ट्रावर एक मोठे संकट आहे, अशीच परिस्थिती महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्यातच पुरोगामी महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री यांची भाषा अर्वाच्य आहे. जनतेला भीती निर्माण करणारी आहे. कुठलाही विकासाचा दृष्टिकोन न ठेवता दमदाटी, दमबाजी करणारे सरकार राज्यात आहे, अशी भावना ही सर्वसामान्य जनतेची झाली आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून राज्यातील हे सरकार फार काळ टिकणार नाही,' असा दावाही प्रा. शिंदे यांनी केला आहे.
वाचा: हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
वाचा: ...म्हणून मी आज हिरो ठरले; कंगनाचा टीकाकारांना टोला
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर माजी मंत्री प्रा. शिंदे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. शिंदे म्हणाले, 'या सरकारचा एक वर्षाचा आढावा घेतला, तर अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. करोना आपत्ती आली. अतिवृष्टी झाली. शेतकरी अडचणीत आला. पाणी आहे तर वीज नाही. वाढीव वीज बिले आली. कुठलीही दूरदृष्टी नसलेले सरकार राज्यात आरूढ आहे,' अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
वाचा: 'एखाद्यानं मूर्खपणा केला म्हणून सरकारनं कायद्याची चौकट मोडू नये'
'राज्यातील सरकार म्हणजे महाराष्ट्रावर एक मोठे संकट आहे, अशीच परिस्थिती महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. त्यातच पुरोगामी महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री यांची भाषा अर्वाच्य आहे. जनतेला भीती निर्माण करणारी आहे. कुठलाही विकासाचा दृष्टिकोन न ठेवता दमदाटी, दमबाजी करणारे सरकार राज्यात आहे, अशी भावना ही सर्वसामान्य जनतेची झाली आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून राज्यातील हे सरकार फार काळ टिकणार नाही,' असा दावाही प्रा. शिंदे यांनी केला आहे.
वाचा: हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; उद्धव ठाकरेंची फटकेबाजी