अ‍ॅपशहर

माजी सैनिकासह कुटुंबातील चौघांची हत्या

माजी सैनिकासह त्याच्या कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या झाल्यानं अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी सुरू आहे.

Maharashtra Times 18 Jun 2017, 11:18 am
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम four of a family found murdered in sheogaon ahmednagar
माजी सैनिकासह कुटुंबातील चौघांची हत्या


माजी सैनिकासह त्याच्या कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या झाल्यानं अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात खळबळ उडाली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी सुरू आहे.

शेवगाव शहरातील मीरा रोड भागात ही घटना घडली. आप्पासाहेब गोविंद हरवणे (५०), सुनंदा हरवणे (४५), स्नेहल (२१) व मकरंद (१४) अशी मृतांची नावं आहेत. लष्करातून निवृत्त झालेले आप्पासाहेब हे भूमिअभिलेख कार्यालयात नोकरीला होते. आज सकाळी हरवणे कुटुंबातील कुणीही घराबाहेर दिसले नाही म्हणून शेजारच्यांनी चौकशी केली असता त्यांना धक्का बसला. आप्पासाहेबांसह त्यांच्या पत्नीचे व मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. शेजाऱ्यांनी लगेचच याची माहिती पोलिसांना दिली.

चाकूनं भोसकून या सर्वांची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात पुढं आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून हत्याकांडामागच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज