अ‍ॅपशहर

‘ज्ञानेश्वर’ देणार प्रतिटन २०० देणार

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०१७-१८च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन २०० रुपयेप्रमाणे बील देण्यात येणार आहे...

Maharashtra Times 16 Sep 2018, 4:00 am

नेवासे : ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०१७-१८च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाला प्रतिटन २०० रुपयेप्रमाणे बील देण्यात येणार आहे. ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले व उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी ही माहिती दिली.

अधिक माहिती देतात डॉ. घुले व अभंग पुढे म्हणाले की, 'मागील सन २०१७-१८ च्या गळीत हंगामात ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने गाळप केलेल्या सर्व उसाचे प्रतिटन २१०० रुपयेप्रमाणे ऊस बिलाची रक्कम यापूर्वीच संबंधित शेतकऱ्यांना दिली आहे. नुकत्याच झालेल्या कारखाना संचालक मंडळाच्या सभेत शेतकऱ्यांना अधिकचे प्रतिटन २०० रुपयांचे पेमेंट लवकरच अदा करून प्रतिटन २३०० रुपये दर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज