अ‍ॅपशहर

बंद घरातून एक लाखाचे दागिने चोरले

बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून एक लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी कल्याण रोडवरील जाधव नगर येथे घडली.

Maharashtra Times 19 May 2017, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gold stolen in nagar
बंद घरातून एक लाखाचे दागिने चोरले


बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून एक लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी कल्याण रोडवरील जाधव नगर येथे घडली. याबाबत कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात

आला आहे.

जाधव नगर येथील ओंकार अपार्टमेंट येथे वैभव जनार्दन अंबिलवादे (वय २७) हे राहतात. मंगळवारी सकाळी ते कामावर गेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराचा दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर घरामध्ये उचकापाचक करून १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत वैभव अंबिलवादे यांनी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पोलिस तपास करीत आहेत.

बिगबाजारसमोर वाहनावर कारवाई

प्रेमदान चौक येथील बिगबाजार समोरील रस्त्यावर धोकादायक स्थितीमध्ये वाहनाचे पार्किंग केल्यामुळे पोलिसांनी अनिल रतन वैरागर (रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर) व विशाल भारतसिंग परदेशी (रा. वाघमळा, सिद्धार्थनगर) यांच्यावर कारवाई केली आहे. याबाबत तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कॉन्स्टेबल भरत पंढरीनाथ गाडीलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अनिल वैरागर व विशाल परदेशी यांनी बिगबाजार समोर त्यांच्याकडे असणारी चारचाकी गाडी (एमएच १२ केजे ४२५९) ही धोकादायक स्थितीमध्ये उभी केली होती. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून टी. एल. भारस्कर तपास करीत आहेत.

बारा आरोपींना पाच वर्षे सक्तमजुरी

जामखेड येथील संतोष भिमाशंकर टेकाळे व पांडुरंग मधूकर भोसले हल्ला प्रकरणामध्ये बारा आरोपींना पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. डिसेंबर २०११ मध्ये खर्डा चौकात संतोष टेकाळे व पांडुरंग भोसले यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी करून न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर झाली. न्यायालयाने या प्रकरणात बारा आरोपींना दोषी ठरवत पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज