अ‍ॅपशहर

अतिरिक्त काम करणार नाही; ग्रामसेवकांचा निर्धार

राज्यात अनेक ठिकाणी ग्रामसेवकांना चेक पोस्टवर ड्युटी लावणे, रेशन दुकानात बसवणे, तहसील कार्यालयात बोलावून घेणे अशी अतिरिक्त कामे सोपवली जात आहेत. त्याचा थेट परिणाम गावातील कामांवर होत आहे. त्यामुळे सरकारने ग्रामसेवकांना मुख्यालय सोडून इतर कोणतेही अतिरिक्त काम देवू नये, अन्यथा सरकारने अशा अतिरिक्त कामांची सक्ती केल्यास ते नाकारण्यात येईल, अशी भूमिका राज्य ग्रामसेवक युनियनने घेतली आहे. राज्य ग्रामसेवक युनियनच्या झालेल्या ऑनलाइन बैठकीत ग्रामसेवकांनी तसा निर्धारच केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jun 2020, 6:09 pm
अहमदनगर: सध्या ग्रामसेवक करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, गावामध्ये बाहेरुन आलेल्यांना क्वारंटाइन करणे, गावातील विकासकामे, नरेगाची कामे अशा अनेक जबाबदार्‍या पार पाडत आहेत. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी ग्रामसेवकांना चेक पोस्टवर ड्युटी लावणे, रेशन दुकानात बसवणे, तहसील कार्यालयात बोलावून घेणे अशी अतिरिक्त कामे सोपवली जात आहेत. त्याचा थेट परिणाम गावातील कामांवर होत आहे. त्यामुळे सरकारने ग्रामसेवकांना मुख्यालय सोडून इतर कोणतेही अतिरिक्त काम देवू नये, अन्यथा सरकारने अशा अतिरिक्त कामांची सक्ती केल्यास ते नाकारण्यात येईल, अशी भूमिका राज्य ग्रामसेवक युनियनने घेतली आहे. राज्य ग्रामसेवक युनियनच्या झालेल्या ऑनलाइन बैठकीत ग्रामसेवकांनी तसा निर्धारच केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gram sevak


करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात ग्रामसेवक मागील सव्वादोन महिन्यांपासून अथकपणे कर्तव्य बजावत आहेत. यापार्श्वभूमीवर युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी प्रथमच राज्यभरातील ग्रामसेवक प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक घेतली. यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदे, संजीव निकम, मिनाक्षी बनसोड, बापू आहिरे, आशिष भागवत, भीवराव दाणे, पुंडलीक पाटील, उध्दव फडतारे, दीपक दवंडे, उमर मुलानी, राजेंद्र पावसे, अशोक नरसाळे, सुनिल नागरे, मंगेश पुंड आदींसह राज्याच्या विविध जिल्ह्यातील ४० प्रतिनिधी सहभागी झाले होते.

निसर्ग वादळाचा मुंबईसह कोणकोणत्या भागाला धोका?

सरकारने ग्रामसेवकांना करोनाच्या संकटकाळात २५ लाखांचे विमा कवच मंजूर केले आहे. ही रक्कम कमी असून किमान ५० लाख ते एक कोटींचे विमा कवच मिळावे, दिवाळीच्या काळात ग्रामसेवकांच्या विनंती तसेच आपसी बदल्या कराव्यात, ग्रामसेवक व त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस आरोग्य विमा मिळावा, कोकणातील ग्रामसेवकांची फळबाग लागवड, नरेगासारख्या कामांतून मुक्तता करावी, सरासरी तीन वर्षांचे सीआर असलेल्यांना कालबध्द पदोन्नतीचा लाभ मिळावा आदी मागण्यांचे या बैठकीत करण्यात आले आहेत.

निसर्ग वादळाची मुंबईकडे कूच; अमित शाहांनी बोलावली बैठक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज