अ‍ॅपशहर

शाळा दुरुस्तीची तयारी

जिल्ह्यातील धोकादायक झालेल्या व मोडकळीस आलेल्या शाळा खोल्यांसाठी निधीच उपलब्ध होत नसल्याने अखेर या कामाची जबाबदारी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींवर टाकली आहे.

Maharashtra Times 11 Dec 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम grampanchayat preparing for repair schools
शाळा दुरुस्तीची तयारी


जिल्ह्यातील धोकादायक झालेल्या व मोडकळीस आलेल्या शाळा खोल्यांसाठी निधीच उपलब्ध होत नसल्याने अखेर या कामाची जबाबदारी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींवर टाकली आहे. शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी चौदाव्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतींना मिळालेला निधी खर्च करण्याच्या सूचना केल्यानंतर ग्रामपंचायत विभागाने दुरुस्तीची तयारी केली आहे. ग्रामपंचायतींनी तयार केलेल्या आराखड्यात शाळा खोल्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी तरतूद केली आहे. शिक्षण विभागाकडून शाळांची माहिती मागवली आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची दुरवस्था झाली असून या शाळा खोल्या धोकादायक झाल्या आहेत. अशा शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे पैसे नसल्याने या खोल्यांची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीनुसार जिल्ह्यातील तब्बल ४ हजार ५७७ शाळा खोल्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे समोर आले आहे. तसेच १ हजार ३०० नव्या शाळा खोल्या बांधण्याची गरज आहे. या कामासाठी दीडशे कोटींच्या निधीची आवश्यकता असून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समिती, राज्य

सरकार तसेच खासगी कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून शाळा खोल्यांसाठी निधा द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु, कोणत्याही मार्गाने निधी उपलब्ध होत नसल्याने शाळा खोल्यांचा मुद्दा दुर्लक्षित राहिला. त्यानंतर मात्र ग्रामपंचातींना मिळालेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे करण्याचा पर्याय पुढे आला आहे.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत या मुद्द्यावर चर्चा होऊन नवीन शाळा खोल्या इमारती व दुरुस्तीवर निधी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण विभागास शाळांची माहिती मागवण्यात आल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांनी सांगितले.

चौकट ः

बांधकाम अशक्य

चौदाव्या वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी ग्रामपंचायतींना मिळाला असला तरी नवीन बांधकाम करण्याइतपत हा निधी नाही. शाळा खोल्यांची किरकोळ दुरुस्तीची कामे करणे शक्य आहे. परंतु, नवीन शाळा बांधकामासाठी जादा निधीची गरज आहे. ग्रामपंचायतींना या व्यतिरिक्त अन्य विकासकामे या निधीतून करायची आहेत. त्यामुळे शाळा खोल्यांची किरकोळ दुरुस्तीचीच कामे या निधीतून करता येतील, असे सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज