अ‍ॅपशहर

‘आपले सरकार’वरील तक्रारीची दखल

राज्य सरकारच्या तक्रार निवारण पोर्टलवर करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन गुरुवारी अतिक्रमण विभागाने नागापूर भागातील रस्त्यावर बसणारा भाजीबाजार हटवला.

Maharashtra Times 21 Apr 2017, 3:00 am
नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम grievance redressal portal
‘आपले सरकार’वरील तक्रारीची दखल


राज्य सरकारच्या तक्रार निवारण पोर्टल (Grievance Redressal Portal) वर करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन गुरुवारी अतिक्रमण विभागाने नागापूर भागातील रस्त्यावर बसणारा भाजीबाजार हटवला. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी अर्धा ट्रक भाजीपाला जप्त केला असून सातत्याने या भागात कारवाई करणार असल्याचे सांगितले.

शहरातील रस्त्यावर असणाऱ्या बेवारस व भंगार गाड्या अतिक्रमण विभाग, आरटीओ व वाहतूक पोलिस यांनी सलग दोन दिवस कारवाई करून हटवल्या. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या गाड्यांची समस्या सुटल्यानंतर विभागाने गुरुवारी सकाळी कापड बाजार, गंजबाजार, मोचीगल्ली, घासगल्ली या भागामध्ये कारवाई सुरू केली. या वेळी रस्त्यावर बसलेल्या छोट्या विक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आला. तसेच, बाजारपेठेत अतिक्रमण होऊ नये, यासाठी अतिक्रमण विभागाने आपली गाडी कापडबाजार परिसरातच दुपारपर्यंत उभी केली होती. दुपारनंतर मात्र सरकारच्या तक्रार निवारण पोर्टलवर करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत अतिक्रमण विभागाने नागापूर येथे जाऊन रस्त्याच्या कडेला असणारा भाजीपाला हटवला.

नागापूर येथे रस्त्याच्या कडेला भरणाऱ्या भाजीबाजारामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे, अशी तक्रार एका नागरिकाने तक्रार निवारण पोर्टल केली होती. तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर तातडीने आमच्या विभागाने जाऊन कारवाई केली आहे.

- सुरेश इथापे, अतिक्रमण विभागप्रमुख

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज