अहमदनगर: सोशल मीडियात सक्रीय असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार यांनी अनेकदा विविध प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मात्र, काल पंतप्रधानांच्या वाढदिवशी बेरोजगार दिन पाळत मोदींना ट्रोल करण्याचा प्रकार त्यांना पटला नाही. ‘पंतप्रधानांच्या जन्मदिनी त्यांच्या विरोधात हॅशटॅग चालवणे किंवा मिम वापरणे आपल्या भारतीय संस्कृतीला साजेसे नसून एकप्रकारे देशाच्या पंतप्रधान पदाचा अवमानच आहे,’ अशा शब्दांत पवार यांनी युवाशक्तीला फटकारले आहे.
युवक काँग्रेसच्या पुढाकारातून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून पाळण्यात आला होता. प्रत्यक्षात आणि सोशल मीडियातूनही यासंबंधी आंदोलने करण्यात आली. यासह अन्य युवकांनीही यात भाग घेत मोदींना लक्ष्य केले होते. पवार यांनी मात्र याबद्दल खेद व्यक्त करत नापसंती व्यक्त केली आहे.
वाचा: ब्राह्मण असल्यामुळं फडणवीस टार्गेट? संजय राऊत म्हणाले...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला. मोदींच्या वाढदिवसानिमित्त समाज माध्यमातून राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळला गेला याचा मला खेद वाटतो. देशाच्या पंतप्रधानांच्या जन्मदिनी त्यांच्या विरोधात हॅशटॅग चालवणे किंवा मिम्स वापरणे आपल्या भारतीय संस्कृतीला साजेसे नसून एकप्रकारे देशाच्या पंतप्रधान पदाचा अवमानच आहे. विशेषतः काल सोशल मीडियावर हॅशटॅग चालवणारे तसेच मिम वापरणारे हे ट्रोलर्स नसून वास्तविक जीवनात बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेली युवा पिढी होती. परंतु काल जे समाज माध्यमांवर घडलं ते चूकच आहे,' असं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. अर्थात, यातून बेरोजगारी आणि त्यामुळं युवकांमध्ये वाढत असलेल्या नैराश्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे.
वाचा: देशात इतका गोंधळ कधीच झाला नव्हता; शिवसेनेची घणाघाती टीका
देशातील सध्याच्या औद्योगिक व आर्थिक स्थितीचं चित्र मांडताना त्यांनी केंद्र सरकारला काही उपायही सुचवले आहेत. जागतिक कामगार संघटनेनुसार, करोना काळात जवळपासस ४१ लाख युवकांचे रोजगार गेले आहेत. सीएमआयच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात २.१० कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक सुमार कामगिरी आहे. देशातील युवक शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. त्यांना नोकऱ्या मात्र मिळत नाहीत. अशी दुर्दैवी परिस्थिती आज ओढवली आहे. दरवर्षी दीड कोटी युवक हे देशाच्या वर्कफोर्स मध्ये दाखल होत असतात, परंतु ६५ ते ७५ टक्के युवकांना अपेक्षित कौशल्य नसल्याने डिग्री असून ही अपेक्षित रोजगार मिळत नाही. एकूणच गेल्या काही वर्षात कौशल्य विकासावर फारसे काम झालेले नाही, हे स्पष्ट होते. करोना काळात काम करण्याच्या पद्धती देखील बदलल्या आहेत. या नव्या पद्धतीना अनुसरून आपल्याला येणाऱ्या काळात कौशल्य कार्यक्रम राबवावे लागतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचा: मुंबईतील जमावबंदीच्या आदेशानंतर आदित्य ठाकरेंचं ट्वीट
‘एनसीआरबी’ च्या अहवालानुसार गेल्या वर्षी देशात झालेल्या एकूण १.३९ लाख आत्महत्यांपैकी बेरोजगारीमुळे १४,०१९ आत्महत्या झाल्या असून १० टक्के आत्महत्या या बेरोजगारांच्या असून दिवसाला सरासरी ३८ बेरोजगारांनी आत्महत्या केल्या आहेत. एकूणच आज देशातील युवक बेरोजगरीच्या दलदलीत अडकला असून या दलदलीतून युवकांना बाहेर काढायचे असल्यास केंद्र सरकारने सार्वजनिक खर्चात वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.
युवक काँग्रेसच्या पुढाकारातून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून पाळण्यात आला होता. प्रत्यक्षात आणि सोशल मीडियातूनही यासंबंधी आंदोलने करण्यात आली. यासह अन्य युवकांनीही यात भाग घेत मोदींना लक्ष्य केले होते. पवार यांनी मात्र याबद्दल खेद व्यक्त करत नापसंती व्यक्त केली आहे.
वाचा: ब्राह्मण असल्यामुळं फडणवीस टार्गेट? संजय राऊत म्हणाले...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला. मोदींच्या वाढदिवसानिमित्त समाज माध्यमातून राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळला गेला याचा मला खेद वाटतो. देशाच्या पंतप्रधानांच्या जन्मदिनी त्यांच्या विरोधात हॅशटॅग चालवणे किंवा मिम्स वापरणे आपल्या भारतीय संस्कृतीला साजेसे नसून एकप्रकारे देशाच्या पंतप्रधान पदाचा अवमानच आहे. विशेषतः काल सोशल मीडियावर हॅशटॅग चालवणारे तसेच मिम वापरणारे हे ट्रोलर्स नसून वास्तविक जीवनात बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेली युवा पिढी होती. परंतु काल जे समाज माध्यमांवर घडलं ते चूकच आहे,' असं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. अर्थात, यातून बेरोजगारी आणि त्यामुळं युवकांमध्ये वाढत असलेल्या नैराश्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे.
वाचा: देशात इतका गोंधळ कधीच झाला नव्हता; शिवसेनेची घणाघाती टीका
देशातील सध्याच्या औद्योगिक व आर्थिक स्थितीचं चित्र मांडताना त्यांनी केंद्र सरकारला काही उपायही सुचवले आहेत. जागतिक कामगार संघटनेनुसार, करोना काळात जवळपासस ४१ लाख युवकांचे रोजगार गेले आहेत. सीएमआयच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात २.१० कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक सुमार कामगिरी आहे. देशातील युवक शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. त्यांना नोकऱ्या मात्र मिळत नाहीत. अशी दुर्दैवी परिस्थिती आज ओढवली आहे. दरवर्षी दीड कोटी युवक हे देशाच्या वर्कफोर्स मध्ये दाखल होत असतात, परंतु ६५ ते ७५ टक्के युवकांना अपेक्षित कौशल्य नसल्याने डिग्री असून ही अपेक्षित रोजगार मिळत नाही. एकूणच गेल्या काही वर्षात कौशल्य विकासावर फारसे काम झालेले नाही, हे स्पष्ट होते. करोना काळात काम करण्याच्या पद्धती देखील बदलल्या आहेत. या नव्या पद्धतीना अनुसरून आपल्याला येणाऱ्या काळात कौशल्य कार्यक्रम राबवावे लागतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचा: मुंबईतील जमावबंदीच्या आदेशानंतर आदित्य ठाकरेंचं ट्वीट
‘एनसीआरबी’ च्या अहवालानुसार गेल्या वर्षी देशात झालेल्या एकूण १.३९ लाख आत्महत्यांपैकी बेरोजगारीमुळे १४,०१९ आत्महत्या झाल्या असून १० टक्के आत्महत्या या बेरोजगारांच्या असून दिवसाला सरासरी ३८ बेरोजगारांनी आत्महत्या केल्या आहेत. एकूणच आज देशातील युवक बेरोजगरीच्या दलदलीत अडकला असून या दलदलीतून युवकांना बाहेर काढायचे असल्यास केंद्र सरकारने सार्वजनिक खर्चात वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.