अ‍ॅपशहर

जिल्ह्याचा निकाल ८५.२९ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा नगर जिल्ह्याचा निकाल ८५.२९ टक्के लागला आहे.

Maharashtra Times 26 May 2016, 12:44 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hsc result
जिल्ह्याचा निकाल ८५.२९ टक्के


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा नगर जिल्ह्याचा निकाल ८५.२९ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत, जिल्ह्यात यंदा बारावीचा निकाल ६.९८ टक्के कमी लागला आहे.

जिल्ह्यात ५८ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५० हजार ९९७ विद्यार्थी पास झाले आहेत. तसेच, यंदा पुन्हा परीक्षा दिलेल्या १ हजार ८५३ विद्यार्थ्यांपैकी ४९१ विद्यार्थी पास झाले. बारावीच्या निकालात जिल्ह्यात सायन्सच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून सायन्सचा एकूण निकाल ९४.७६ टक्के लागला आहे. तर, वाणिज्य शाखेचे ९०.७८ व कला शाखेचे ७५.७१ विद्यार्थी पास झाले आहेत.

निकाल देणाऱ्या वेबसाइट एक वाजता अपडेट झाल्या. शहरातील सायबर कॅफेत निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली होती. तर, अनेकांनी मोबाइलवरून निकाल पाहिले. काही कॉलेजांतही विद्यार्थ्यांना निकाल पाहण्याची सोय केली होती. विद्यार्थ्यांना आपल्या ३ जूनला संबंधित कॉलेजांत मिळणार आहेत.

मुलींची बाजी

जिल्ह्यामध्ये २४ हजार ५२४ मुलींनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी २४ हजार ४७९ मुलींनी परीक्षा दिली असून त्यापैकी २२ हजार ४९२, म्हणजेच ९१.८८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, जिल्ह्यामध्ये ३५ हजार ९४८ मुलांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी ३५ हजार ८८७ मुलांनी परीक्षा दिली असून त्यापैकी २८ हजार ९९६ मुले उत्तीर्ण झाले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज