अहमदनगर : हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना अनेकदा घडत असतात. अहमदनगरमध्ये मात्र अशाच कारणावरून पत्नीने नव्हे तर पतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. भटक्या आदिवासी समाजात मुलीने मुलाकडून हुंडा घेण्याची कुप्रथा आहे. त्यातून हा प्रकार घडला. (Ahmednagar Suicide News)
मुलीकडील नातेवाईकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मुलाचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत.
नगर शहराजवळील भवानीनगर येथील एक कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलं आहे. मुलाचे वडील कदम चव्हाण यांच्याकडून या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा धनेश चव्हाण याचा विवाह पूजा हिच्याशी ७ जानेवारी २०२१ रोजी झाला होता. त्यांच्या समाजाच्या रुढी परंपरा नुसार मुलीकडील लोकांना हुंडा द्यावा लागतो. त्यानुसार तीन लाख रुपये देणे ठरले होते. त्यापैकी ५० हजार रुपये दिले होते. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले होते. परंतु मुलीकडील लोकांनी पैशासाठी तगादा सुरू केला. पैशासाठी मानसिक छळ सुरू केला. या जाचाला कंटाळून धनेश चव्हाण याने विषारी औषध घेतले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.'
'पोलीस मदत करत नाहीत म्हणून...'
'मुलगा हा बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्याचा जबाब नोंदवला गेला नाही. आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी तीन-चार वेळा गेलो, परंतु आमची कोणत्याही प्रकारची तक्रार घेण्यात आलेली नाही. माझा करता मुलगा हुंडाबळी ठरला आहे. या गुन्ह्यात त्याची पत्नी, सासरा, सासू, मेहुणा (सर्व रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही उपोषणला बसलो आहोत. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर हे सत्य उघडकीस येईल. मात्र, पोलीस मदत करत नसल्याने आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे,' असंही मुलाचे वडील कदम चव्हाण यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, चव्हाण कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसले आहेत.
मुलीकडील नातेवाईकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मुलाचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत.
नगर शहराजवळील भवानीनगर येथील एक कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलं आहे. मुलाचे वडील कदम चव्हाण यांच्याकडून या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा धनेश चव्हाण याचा विवाह पूजा हिच्याशी ७ जानेवारी २०२१ रोजी झाला होता. त्यांच्या समाजाच्या रुढी परंपरा नुसार मुलीकडील लोकांना हुंडा द्यावा लागतो. त्यानुसार तीन लाख रुपये देणे ठरले होते. त्यापैकी ५० हजार रुपये दिले होते. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले होते. परंतु मुलीकडील लोकांनी पैशासाठी तगादा सुरू केला. पैशासाठी मानसिक छळ सुरू केला. या जाचाला कंटाळून धनेश चव्हाण याने विषारी औषध घेतले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.'
'पोलीस मदत करत नाहीत म्हणून...'
'मुलगा हा बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्याचा जबाब नोंदवला गेला नाही. आम्ही कोतवाली पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यासाठी तीन-चार वेळा गेलो, परंतु आमची कोणत्याही प्रकारची तक्रार घेण्यात आलेली नाही. माझा करता मुलगा हुंडाबळी ठरला आहे. या गुन्ह्यात त्याची पत्नी, सासरा, सासू, मेहुणा (सर्व रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा) या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही उपोषणला बसलो आहोत. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर हे सत्य उघडकीस येईल. मात्र, पोलीस मदत करत नसल्याने आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली आहे,' असंही मुलाचे वडील कदम चव्हाण यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, चव्हाण कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसले आहेत.