अ‍ॅपशहर

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी... संकरित गायीच्या पोटी जन्मली देशी कालवड

Maharashtra News : दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेले एक मोठे संशोधन समोर आले आहे. विद्यापीठाच्या गो संशोधन व विकास प्रकल्पात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान यशस्वी झाले आहे. एका संकरित गायीच्या पोटी देशी कालवड जन्मली आहे.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स 6 Aug 2022, 5:13 pm
अहमदनगर : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गो संशोधन व विकास प्रकल्पातील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. संकरित गायीच्या पोटी पहिल्यांदाच देशी गीर जातीच्या कालवडीचा जन्म झाला आहे. आणखी दीडशे गायी लवकरच अशा वसारांना जन्म देणार आहेत. ऑक्टोबर २०२१ मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hybrid cow gives birth indian gir cow breed
शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी... संकरित गायीच्या पोटी जन्मली देशी कालवड


पुण्यातील कृषी महाविद्यालयात हे केंद्र आहे. तिथे राज्यपालांच्या हस्ते या प्रगत तंत्रज्ञान वापराचा प्रारंभ करण्यात आला होता. या तंत्रज्ञानाच्या वापराने राहुरी येथील गो संशोधन व विकास प्रकल्प केंद्रात संकरित गायीच्या माध्यमातून पहिल्याच गीर जातीच्या कालवडीचा जन्म झाला आहे. या कालवडीचे वजन २२.९ किलो आहे. या वशांतील कालवडची दूध देण्याची क्षमता ४१६५ लीटर आहे, अशी माहिती भ्रूण प्रत्यारोपण समन्वयक डॉ. विष्णू नरवडे यांनी दिली.

महाराष्ट्र सरकारने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकऱ्यांच्या गोठ्यात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुरवात केली आहे. या प्रकल्पांतर्गत दीडशेपेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली. हे तंत्रज्ञान एनडीडीबी राहुरी यांच्या मार्फत राबविण्यात येत असून उच्च वंशावळीचा देशी गोवंश व त्यांची संख्या भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानात उत्कृष्ट अनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळविले जाते. त्यांच्या प्रयोगशाळेत चांगली अनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन केले जाते. तयार झालेल्या फलित अंडाची (पोटेन्शियल झायगोट) सात दिवस वाढ करून त्यापासून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता गायीमध्ये प्रस्थापित करून त्याची वाढ केली जाते. त्यापासून उच्च दर्जाचे वासरू मिळते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, आधी भारतीयांना किंमत नव्हती; रोहित पवारांनी दिले सडेतोड उत्तर

‘देशामध्ये देशी गाईंची घटती संख्या पाहता भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हा आशेचा किरण आहे. या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत होणे गरजेचे आहे. देशामध्ये एकूण गाईच्या संख्येपैकी ७५ टक्के गाई गावठी स्वरूपात आढळतात. फक्त २५ टक्के गायी शुद्ध स्वरूपात आहेत. त्यामुळे भविष्यात उच्च दर्जाच्या जलदगीतेने गायी तयार करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे,’ असे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील म्हणाले.

अफगाण धर्मगुरूची हत्या; नगर पोलिसांना मोठे यश, तिघे हॉटेलमध्ये जेवायला बसले अन् तिथेच फसले
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख