नगर: के के रेंज जमीन अधिग्रहण प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पारनेरचे आमदार निलेश लंकेंसह नुकतीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर के के रेंजसाठी जमीन संपादित होणार नसल्याची ग्वाही संरक्षण मंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक खुलासा व माहिती कागदपत्रांच्या आधारे आपण लवकरच संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मांडणार असल्याचे स्पष्ट केलयं. के के रेंज जमिनीचे संपादन होणार की नाही, यासंदर्भात संभ्रम दूर करू, असेही त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. त्यामुळे या प्रश्नावरून पुन्हा राजकारण सुरू होण्याची चिन्हे आहेत. ( BJP MP Sujay Vikhe Patil on KK Range )
वाचा: शरद पवार थेट देशाच्या संरक्षणमंत्र्यांना भेटले; 'हे' आहे कारण
के के रेंज विस्तारीकरणाचा विषय ऐरणीवर आला आहे. राहुरी, नगर, पारनेर तालुक्यांतील २३ गावांमधील शेतकऱ्यांकडून विस्तारीकरणाला विरोध वाढत आहे. याशिवाय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू लागले आहेत. खासदार डॉ. सुजय विखे यांनी देखील या प्रश्नात लक्ष घालत तिन्ही तालुक्यांतील विविध गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन संवाद साधला होता. तर, दुसरीकडे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. या प्रश्नाबाबत नुकतेच पवार हे सुद्धा संरक्षणमंत्र्यांना भेटून आले. त्यातच आता पुन्हा खासदार विखे यांनीही प्रसिद्धीपत्रक देत याबाबत लवकरच वस्तुस्थितीदर्शक परिस्थिती मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वाचा: कांदा निर्यातबंदी: शरद पवारांनी केंद्राला करून दिली 'या' धोक्याची जाणीव
‘के के रेंज अर्थात खारे कर्जुने रेंज संदर्भात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर के के रेंज साठी भूसंपादन होणार नसल्याची माहिती स्थानिक स्तरावर देण्यात आल्याचे समजते. सगळ्यात प्रथम या प्रश्नासंदर्भात आपण माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना सोबत घेऊन केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना भेटून विस्तृत चर्चा केलेली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना अवगत केलेल्या आहेत. केवळ संरक्षणमंत्री नव्हे तर देशाचे लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे त्यांच्याशी देखील चर्चा करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्याची विनंती केली. स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्याबाबतची मते जाणून घेतल्यानंतरच कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले होते. या प्रश्नासंदर्भात आपण राहुरी , पारनेर आणि नगर तालुक्यातील २३ गावांमधील शेतकऱ्यांबरोबर मागील महिन्यात संवाद साधला होता. नुकतेच माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संरक्षण मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर के के रेंज साठी जमीन संपादित होणार नसल्याचे स्थानिक स्तरावर सांगण्यात आल्याचे समजले. पण याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक खुलासा व माहिती कागदपत्रांच्या आधारे आपण लवकरच संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मांडू व के के रेंज जमिनीचे संपादन होणार की नाही, यासंदर्भात याबाबतचा संभ्रम दूर करू, असे खासदार विखे पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
वाचा: उठसूठ फडणवीसांवर आरोप करण्यात अर्थ नाही; पाटलांचा खडसेंना सल्ला
वाचा: शरद पवार थेट देशाच्या संरक्षणमंत्र्यांना भेटले; 'हे' आहे कारण
के के रेंज विस्तारीकरणाचा विषय ऐरणीवर आला आहे. राहुरी, नगर, पारनेर तालुक्यांतील २३ गावांमधील शेतकऱ्यांकडून विस्तारीकरणाला विरोध वाढत आहे. याशिवाय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू लागले आहेत. खासदार डॉ. सुजय विखे यांनी देखील या प्रश्नात लक्ष घालत तिन्ही तालुक्यांतील विविध गावात जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन संवाद साधला होता. तर, दुसरीकडे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार निलेश लंके यांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. या प्रश्नाबाबत नुकतेच पवार हे सुद्धा संरक्षणमंत्र्यांना भेटून आले. त्यातच आता पुन्हा खासदार विखे यांनीही प्रसिद्धीपत्रक देत याबाबत लवकरच वस्तुस्थितीदर्शक परिस्थिती मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वाचा: कांदा निर्यातबंदी: शरद पवारांनी केंद्राला करून दिली 'या' धोक्याची जाणीव
‘के के रेंज अर्थात खारे कर्जुने रेंज संदर्भात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर के के रेंज साठी भूसंपादन होणार नसल्याची माहिती स्थानिक स्तरावर देण्यात आल्याचे समजते. सगळ्यात प्रथम या प्रश्नासंदर्भात आपण माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना सोबत घेऊन केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना भेटून विस्तृत चर्चा केलेली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना अवगत केलेल्या आहेत. केवळ संरक्षणमंत्री नव्हे तर देशाचे लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे त्यांच्याशी देखील चर्चा करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय घेण्याची विनंती केली. स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्याबाबतची मते जाणून घेतल्यानंतरच कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले होते. या प्रश्नासंदर्भात आपण राहुरी , पारनेर आणि नगर तालुक्यातील २३ गावांमधील शेतकऱ्यांबरोबर मागील महिन्यात संवाद साधला होता. नुकतेच माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संरक्षण मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर के के रेंज साठी जमीन संपादित होणार नसल्याचे स्थानिक स्तरावर सांगण्यात आल्याचे समजले. पण याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक खुलासा व माहिती कागदपत्रांच्या आधारे आपण लवकरच संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मांडू व के के रेंज जमिनीचे संपादन होणार की नाही, यासंदर्भात याबाबतचा संभ्रम दूर करू, असे खासदार विखे पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
वाचा: उठसूठ फडणवीसांवर आरोप करण्यात अर्थ नाही; पाटलांचा खडसेंना सल्ला