नगर :
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली एकीकडे राज्यात सुरू असतानाच स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या झपाट्याने वाढत आहे. माध्यमिक शिक्षण विभागातून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत दीडशेपेक्षा जास्त अशा कॉलेजांना मान्यता मिळाली आहे. आता जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजांची संख्या ४९५ झाली असून अकरावीच्या जागांची क्षमताही वाढली आहे. गेल्यावर्षीपासून मात्र, अशी महाविद्यालये मागण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही.
जिल्ह्यामध्ये अनुदानित व विनाअनुदानित दोन्ही मिळून ३०२ महाविद्यालये आहेत. २०१२-१३ पासून जिल्ह्यामध्ये वेगाने स्वयंअर्थसहाय्यित कॉलेजांची संख्या वाढू लागल्याने तो ही संख्या ४९५ वर गेली. शिक्षण विभागातून मिळालेल्या माहितीनुसार शैक्षणिक वर्ष २०१२-१३ पासून २०१६-१७ पर्यंत जिल्ह्यामध्ये दीडशेपेक्षा जास्त स्वयंअर्थसहाय्यित कॉलेज मान्यताप्राप्त आहेत. त्यापैकी शंभरपेक्षा जास्त कॉलेजांनी प्रथम मान्यता घेतली असून उर्वरीत कॉलेजांकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वयंअर्थसहाय्यित कॉलेजांमुळे अकरावीच्या जागा या जवळपास पंधरा हजारांनी वाढल्या आहेत. स्वयंअर्थसहाय्यित कॉलेजांना मान्यता घेताना संस्थांचा कल सायन्स व वाणिज्य शाखेला जास्त असतो. त्यामुळे या दोन्ही शाखांच्या जागा वाढत आहे. त्यातुलनेत दहावीला उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया जिल्ह्यामध्ये सोपी झाली आहे. दरम्यान, यंदाच्या शैक्षणिक वर्षात अद्यापपर्यंत एकही प्रस्ताव दाखल झाला नाही.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली एकीकडे राज्यात सुरू असतानाच स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या झपाट्याने वाढत आहे. माध्यमिक शिक्षण विभागातून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत दीडशेपेक्षा जास्त अशा कॉलेजांना मान्यता मिळाली आहे. आता जिल्ह्यातील ज्युनिअर कॉलेजांची संख्या ४९५ झाली असून अकरावीच्या जागांची क्षमताही वाढली आहे. गेल्यावर्षीपासून मात्र, अशी महाविद्यालये मागण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही.
जिल्ह्यामध्ये अनुदानित व विनाअनुदानित दोन्ही मिळून ३०२ महाविद्यालये आहेत. २०१२-१३ पासून जिल्ह्यामध्ये वेगाने स्वयंअर्थसहाय्यित कॉलेजांची संख्या वाढू लागल्याने तो ही संख्या ४९५ वर गेली. शिक्षण विभागातून मिळालेल्या माहितीनुसार शैक्षणिक वर्ष २०१२-१३ पासून २०१६-१७ पर्यंत जिल्ह्यामध्ये दीडशेपेक्षा जास्त स्वयंअर्थसहाय्यित कॉलेज मान्यताप्राप्त आहेत. त्यापैकी शंभरपेक्षा जास्त कॉलेजांनी प्रथम मान्यता घेतली असून उर्वरीत कॉलेजांकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वयंअर्थसहाय्यित कॉलेजांमुळे अकरावीच्या जागा या जवळपास पंधरा हजारांनी वाढल्या आहेत. स्वयंअर्थसहाय्यित कॉलेजांना मान्यता घेताना संस्थांचा कल सायन्स व वाणिज्य शाखेला जास्त असतो. त्यामुळे या दोन्ही शाखांच्या जागा वाढत आहे. त्यातुलनेत दहावीला उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया जिल्ह्यामध्ये सोपी झाली आहे. दरम्यान, यंदाच्या शैक्षणिक वर्षात अद्यापपर्यंत एकही प्रस्ताव दाखल झाला नाही.