म. टा. प्रतिनिधी, नगर
वारकरी संप्रदायाला आणखी पुढे नेण्यासाठी आणि वारकरी शिक्षण संस्थांची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अखिल भारतीय शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वारकरी आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. उद्धव महाराज यांनी राज्यातील वारकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. बैठकीला मराठा महासंघाच्या युवकांचे प्रदेशाध्यक्ष संतोष नानावटे, अॅड. साईराम बानकर, अनंता तनपुरे, संदीप खुटवड, संभाजी निढाकार (पुणे), सागर भोसले (सातारा), अप्पासाहेब लाड, प्रवीण पाटील (कोल्हापूर), प्रशांतत चावरे (सोलापूर), परशुराम कासुळे, सुभाष पवार, सजित जाधव, अक्षय जाधव, अच्च्युत जाधव (नगर), गजानन घोगरे (सोलापूर), सचिन जाधव रत्नागिरी, अॅड. गजेंद्र भोसले, पराग बोडसे, दिलीप पटेल (धुळे), विजय पाटील, प्रवीण पाटील (जळगाव), बालाजी कदम (औरंगाबाद), गणेश नाईकवाडे (बीड), सुदर्शन बहिरट (उस्मानाबाद), संजय रेगे पाटील (लातूर), रोहित पवार (नांदेड), सचिन भिसे (बुलडाणा) उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पात सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या तरतुदी मांडल्या जाणार आहेत. वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र मराठी माणसाला जगण्याची ताकद आणि उमेद मिळालेली आहे. अभंग, कीर्तने, भारुड, प्रवचानातून माणसाला जगण्याची ताकद मिळात असून संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, नामदेव महाराजांपासून ते तनपुरे महाराज यांच्यापर्यंत वारकरी संप्रदायाचे काम अविरतपणे सुरू आहे. यामुळेच असे शिक्षण देणाऱ्या संस्थांना भरीव मदत देण्याचे सरकारचे धोरण आहे.’
वारकरी संप्रदायाला आणखी पुढे नेण्यासाठी आणि वारकरी शिक्षण संस्थांची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अखिल भारतीय शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वारकरी आणि शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. उद्धव महाराज यांनी राज्यातील वारकऱ्यांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. बैठकीला मराठा महासंघाच्या युवकांचे प्रदेशाध्यक्ष संतोष नानावटे, अॅड. साईराम बानकर, अनंता तनपुरे, संदीप खुटवड, संभाजी निढाकार (पुणे), सागर भोसले (सातारा), अप्पासाहेब लाड, प्रवीण पाटील (कोल्हापूर), प्रशांतत चावरे (सोलापूर), परशुराम कासुळे, सुभाष पवार, सजित जाधव, अक्षय जाधव, अच्च्युत जाधव (नगर), गजानन घोगरे (सोलापूर), सचिन जाधव रत्नागिरी, अॅड. गजेंद्र भोसले, पराग बोडसे, दिलीप पटेल (धुळे), विजय पाटील, प्रवीण पाटील (जळगाव), बालाजी कदम (औरंगाबाद), गणेश नाईकवाडे (बीड), सुदर्शन बहिरट (उस्मानाबाद), संजय रेगे पाटील (लातूर), रोहित पवार (नांदेड), सचिन भिसे (बुलडाणा) उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पात सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या तरतुदी मांडल्या जाणार आहेत. वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र मराठी माणसाला जगण्याची ताकद आणि उमेद मिळालेली आहे. अभंग, कीर्तने, भारुड, प्रवचानातून माणसाला जगण्याची ताकद मिळात असून संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, नामदेव महाराजांपासून ते तनपुरे महाराज यांच्यापर्यंत वारकरी संप्रदायाचे काम अविरतपणे सुरू आहे. यामुळेच असे शिक्षण देणाऱ्या संस्थांना भरीव मदत देण्याचे सरकारचे धोरण आहे.’