म. टा. प्रतिनिधी, नगर
‘महात्मा गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा पहिला आतंकवादी असून, त्याची निर्मिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे’, असा गंभीर आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला. ‘देशात अघोषित आणीबाणीचे वातावरण असून, त्याच्या निषेधार्थ देशातील समविचारी संघटना व पक्षांची रॅली येत्या २५ जानेवारीला दिल्लीत काढली जाणार असून, रामलिला मैदानावर मेळावा घेतला जाणार असल्याचे’ही त्यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यातील निघोज व अन्य ठिकाणच्या कार्यक्रमानिमित्त नगरला आलेल्या प्रा. कवाडे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष सुनील क्षेत्रे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ‘आग्र्याचा ताजमहाल हा देशाचा कलंक व महिलांच्या अपमानाचे प्रतीक असल्याचे संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणत असले तरी, तुमच्या धर्मग्रंथांनी महिलांना गुलाम केले आहे, त्याचे काय?’, असा सवाल प्रा. कवाडेंनी केला. ‘ताजमहाल हा जागतिक वारसा असून, त्याच्या पर्यटनातून रोजगार मिळतो. पण संघाकडून भडकावू वक्तव्ये करून अल्पसंख्याक समाजात भीती व दहशत निर्माण केली जात आहे’, असा आरोपही त्यांनी केला.
‘देशाच्या विरोधात बोलणे हा राष्ट्रद्रोहच असतो, पण एखाद्या सरकारविरोधात बोलणे राष्ट्रद्रोह कसा होऊ शकेल?’, असा सवाल करून प्रा. कवाडे म्हणाले, ‘कन्हैयाकुमार व हार्दिक पटेलसारखे युवक भाजप सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. भाषणस्वातंत्र्यास प्रतिबंध करणे म्हणजे अघोषित आणीबाणीच आहे. देशाचे अखंडत्व कायम राहण्यासाठी दिल्लीत जानेवारील रॅली काढणार आहे.’
सावध पवित्रा
राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालिश मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रा. कवाडे यांनी सावध पवित्रा घेतला. ‘पवार हे जाणते राजे व ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे ते बोलतात त्यात तथ्य असेल. पण दिलीप वळसेंच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमात याच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीशेजारी पवार बसले होते. तरीही ते जे बोलतात, ते साधे नसते. कर्जमाफीचा सध्या जो घोळ सुरू आहे, त्या अनुषंगाने ते बोलले असतील’, असे मत कवाडेंनी व्यक्त केले.
‘महात्मा गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा पहिला आतंकवादी असून, त्याची निर्मिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे’, असा गंभीर आरोप पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला. ‘देशात अघोषित आणीबाणीचे वातावरण असून, त्याच्या निषेधार्थ देशातील समविचारी संघटना व पक्षांची रॅली येत्या २५ जानेवारीला दिल्लीत काढली जाणार असून, रामलिला मैदानावर मेळावा घेतला जाणार असल्याचे’ही त्यांनी सांगितले.
पारनेर तालुक्यातील निघोज व अन्य ठिकाणच्या कार्यक्रमानिमित्त नगरला आलेल्या प्रा. कवाडे यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष सुनील क्षेत्रे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ‘आग्र्याचा ताजमहाल हा देशाचा कलंक व महिलांच्या अपमानाचे प्रतीक असल्याचे संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणत असले तरी, तुमच्या धर्मग्रंथांनी महिलांना गुलाम केले आहे, त्याचे काय?’, असा सवाल प्रा. कवाडेंनी केला. ‘ताजमहाल हा जागतिक वारसा असून, त्याच्या पर्यटनातून रोजगार मिळतो. पण संघाकडून भडकावू वक्तव्ये करून अल्पसंख्याक समाजात भीती व दहशत निर्माण केली जात आहे’, असा आरोपही त्यांनी केला.
‘देशाच्या विरोधात बोलणे हा राष्ट्रद्रोहच असतो, पण एखाद्या सरकारविरोधात बोलणे राष्ट्रद्रोह कसा होऊ शकेल?’, असा सवाल करून प्रा. कवाडे म्हणाले, ‘कन्हैयाकुमार व हार्दिक पटेलसारखे युवक भाजप सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. भाषणस्वातंत्र्यास प्रतिबंध करणे म्हणजे अघोषित आणीबाणीच आहे. देशाचे अखंडत्व कायम राहण्यासाठी दिल्लीत जानेवारील रॅली काढणार आहे.’
सावध पवित्रा
राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालिश मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रा. कवाडे यांनी सावध पवित्रा घेतला. ‘पवार हे जाणते राजे व ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे ते बोलतात त्यात तथ्य असेल. पण दिलीप वळसेंच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमात याच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीशेजारी पवार बसले होते. तरीही ते जे बोलतात, ते साधे नसते. कर्जमाफीचा सध्या जो घोळ सुरू आहे, त्या अनुषंगाने ते बोलले असतील’, असे मत कवाडेंनी व्यक्त केले.