म. टा. प्रतिनिधी, नगर
'देशाची ताकद राज्यघटनेत आहे. त्यामुळे साहित्य निर्मितीही राज्यघटनेला स्मरूणच झाली पाहिजे. अभासी व काल्पनिक साहित्यापेक्षाही वस्तुस्थिती मांडणारे साहित्य समाजासाठी उपयोगी आहे. फुले-शाहू-आंबेडकरांनी व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी शिक्षणाचा संदेश दिला, त्यांचे हे विचार पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे', असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांनी येथे केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोळसे यांच्या हस्ते सावेडीतील कोहिनूर मंगल कार्यालयात झाले. यावेळी राज्य घटनेच्या प्रास्ताविकाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. संमेलनाध्यक्ष भारत सासणे, श्रमिक विश्वचे संपादक प्रा. राम बाहेती, संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. अशोक शिंदे, प्रा. डॉ. जयदेव डोळे, साहित्यिक लहू कानडे, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, स्मिता पानसरे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, स्वागताध्यक्ष राजेंद्र उदागे, परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, कार्याध्यक्ष भाऊसाहेब सावंत, अॅड. सुभाष लांडे आदी उपस्थित होते.
'समाजाला छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे', असे सांगून कोळसे म्हणाले, 'विकास मोठी विमानतळे वा बुलेट ट्रेन यातून होणार नाही, तर स्वतंत्र विचारांच्या तरुण पिढीची निर्मिती होणे आवश्यक आहे. अशी पिढी घडवण्यासाठी साहित्यिकांनी लेखनातून योगदान द्यायला हवे', असे आवाहनही त्यांनी केले.
'देशाची ताकद राज्यघटनेत आहे. त्यामुळे साहित्य निर्मितीही राज्यघटनेला स्मरूणच झाली पाहिजे. अभासी व काल्पनिक साहित्यापेक्षाही वस्तुस्थिती मांडणारे साहित्य समाजासाठी उपयोगी आहे. फुले-शाहू-आंबेडकरांनी व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी शिक्षणाचा संदेश दिला, त्यांचे हे विचार पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे', असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांनी येथे केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोळसे यांच्या हस्ते सावेडीतील कोहिनूर मंगल कार्यालयात झाले. यावेळी राज्य घटनेच्या प्रास्ताविकाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. संमेलनाध्यक्ष भारत सासणे, श्रमिक विश्वचे संपादक प्रा. राम बाहेती, संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. अशोक शिंदे, प्रा. डॉ. जयदेव डोळे, साहित्यिक लहू कानडे, कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, स्मिता पानसरे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, स्वागताध्यक्ष राजेंद्र उदागे, परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, कार्याध्यक्ष भाऊसाहेब सावंत, अॅड. सुभाष लांडे आदी उपस्थित होते.
'समाजाला छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे', असे सांगून कोळसे म्हणाले, 'विकास मोठी विमानतळे वा बुलेट ट्रेन यातून होणार नाही, तर स्वतंत्र विचारांच्या तरुण पिढीची निर्मिती होणे आवश्यक आहे. अशी पिढी घडवण्यासाठी साहित्यिकांनी लेखनातून योगदान द्यायला हवे', असे आवाहनही त्यांनी केले.