म. टा. प्रतिनिधी, नगर
घरपट्टी व पाणीपट्टीच्या संकलित कराची थकबाकी असल्याने महापालिकेने कायनेटिक कंपनीचे प्रशासकीय कार्यालय सील केल्याने कामगार व कर्मचाऱ्यांचे पगार व अन्य कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे दसरा-दिवाळीच्या काळात पगार, बोनस, अॅडव्हान्स मिळण्यास अडचणी येणार असल्याने कामगारांनी गुरुवारी (२८ सप्टेंबर) महापालिकेवर मोर्चा आणला. पण मनपाचीही आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने कंपनी व्यवस्थापनाने महापालिकेचे थोडे तरी पैसे जमा करावेत, असा सल्ला पालिका प्रशासनाने कामगारांना दिला. त्यानुसार हे कामगार शुक्रवारी सकाळी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून त्याची माहिती महापालिकेला देणार आहेत.
कायनेटिक कंपनीकडे महापालिकेची संकलित कराची ३ कोटी ३३ लाखाची थकबाकी आहे. ती भरण्याबाबत वारंवार सांगूनही कंपनीद्वारे कार्यवाही झाली नसल्याने मागच्या आठवड्यात महापालिकेने या कंपनीचे प्रशासकीय कार्यालय सील केले व येत्या ११ व १२ ऑक्टोबरला कंपनीचा लिलावही जाहीर केला होता. मात्र, कंपनीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या लिलावास स्थगिती तसेच महापालिकेने तातडीने सील काढण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र, महापालिकेने अद्याप सील काढलेले नाही व या निकालास आव्हान देण्यासाठी खंडपीठात जाण्याचीही तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीतील कामगारांनी आज महापालिकेवर मोर्चा नेऊन सील काढण्याची मागणी केली, पण त्याला नकार देताना कंपनीच्या व्यवस्थापनास मनपाचे पैसे भरण्यास कामगारांनीच भाग पाडावे, असे आवाहनही त्यांना केले गेले.
घरपट्टी व पाणीपट्टीच्या संकलित कराची थकबाकी असल्याने महापालिकेने कायनेटिक कंपनीचे प्रशासकीय कार्यालय सील केल्याने कामगार व कर्मचाऱ्यांचे पगार व अन्य कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे दसरा-दिवाळीच्या काळात पगार, बोनस, अॅडव्हान्स मिळण्यास अडचणी येणार असल्याने कामगारांनी गुरुवारी (२८ सप्टेंबर) महापालिकेवर मोर्चा आणला. पण मनपाचीही आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने कंपनी व्यवस्थापनाने महापालिकेचे थोडे तरी पैसे जमा करावेत, असा सल्ला पालिका प्रशासनाने कामगारांना दिला. त्यानुसार हे कामगार शुक्रवारी सकाळी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून त्याची माहिती महापालिकेला देणार आहेत.
कायनेटिक कंपनीकडे महापालिकेची संकलित कराची ३ कोटी ३३ लाखाची थकबाकी आहे. ती भरण्याबाबत वारंवार सांगूनही कंपनीद्वारे कार्यवाही झाली नसल्याने मागच्या आठवड्यात महापालिकेने या कंपनीचे प्रशासकीय कार्यालय सील केले व येत्या ११ व १२ ऑक्टोबरला कंपनीचा लिलावही जाहीर केला होता. मात्र, कंपनीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या लिलावास स्थगिती तसेच महापालिकेने तातडीने सील काढण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र, महापालिकेने अद्याप सील काढलेले नाही व या निकालास आव्हान देण्यासाठी खंडपीठात जाण्याचीही तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीतील कामगारांनी आज महापालिकेवर मोर्चा नेऊन सील काढण्याची मागणी केली, पण त्याला नकार देताना कंपनीच्या व्यवस्थापनास मनपाचे पैसे भरण्यास कामगारांनीच भाग पाडावे, असे आवाहनही त्यांना केले गेले.