म. टा. वृत्तसेवा, कर्जत
तालुक्यातील एकाच गावात व तालुक्यात हवामान वेगळे असल्याचा जिल्हा सहकारी बँकेचा निकष शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून विमा कंपन्या ज्या गावामध्ये पीक विमा देतात त्याच गावामध्ये हवामानावर अधारित पीक विमा जिल्हा बँक देत नाही. या धोरणाचा तातडीने विचार करावा. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ते पैसे मिळावेत, अशी मागणी कर्जत तालुक्याचे नेते अॅड. कैलास शेवाळे यांनी केली.
बँकेच्या कार्यकारी संचालकांना अॅड. शेवाळे यांनी याबाबत पत्र दिले आहे. यामध्ये बँकेच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी औरंगाबाद खंडपीठात खटला भरण्याचा इशारा दिला आहे. पत्रात शेवाळे यांनी पुढे म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील पाटेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना खरीप हंगाम (मृग भार) २०१६-१७ मध्ये सुमारे ६५ शेतकरी सभासदांनी उतरविला होता. यासाठी १ लाख ७७ हजार रुपये विमा डाळिंबाचा भरला आहे. मात्र, त्यांना विमा मंजूर झाला नाही. तसेच याच भागातील माहीजळगाव, चापडगाव, चिंचोली या परिसरातील शेतकऱ्यांनाही जिल्हा बँकेने पीक विमा मंजूर केला नाही.
याच भागातील माहीजळगाव परिसरातील ११ शेतकऱ्यांनी डाळिंबाचा स्वतःच पीक विमा उतरवला होता. त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने पीक विमा मंजूर केला आहे. याचा अर्थ खासगी कपंनीमार्फत उतरवलेला शेतकऱ्यांचा विमा व जिल्हा बँकेच्या सेवा संस्थेमार्फत उतरविलेला विमा यामध्ये जाणीवपूर्वक दुजाभाव करण्यात येत आहे. जिल्हा बँकेने तालुक्यातील राशिन, भांबोरा व कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा विमा मंजूर केला आहे, मग माहीजळगाव परिसरातील शेतकऱ्यांवर अन्याय का?
एकाच गावामध्ये व तालुक्यामध्ये त्याच कालवधीमध्ये वेगवेगळे हावामान कसे असू शकते? प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये वेगळे हवामान असते का? याचा खुलासा बँकेने करावा. पारनेर तालुक्यात वाडेगव्हाण, निघोज या जास्त लागवडीखाली असलेल्या सर्कलमधील विमा सुरुवातीस नाकारला होता; मात्र, आता पुन्हा सर्कलच्या आत मंजूर केला जातो. त्यामुळे माहीजळगाव परिसरातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान विमा न मिळाल्याने झाले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना पात्र असतानाही पीक विमा मिळाला नाही तर औरंगाबाद खंडपीठामध्ये बँकेच्या विरोधात खटला भरण्याचा इशारा निवेदनात शेवाळे यांनी दिला आहे.
तालुक्यातील एकाच गावात व तालुक्यात हवामान वेगळे असल्याचा जिल्हा सहकारी बँकेचा निकष शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून विमा कंपन्या ज्या गावामध्ये पीक विमा देतात त्याच गावामध्ये हवामानावर अधारित पीक विमा जिल्हा बँक देत नाही. या धोरणाचा तातडीने विचार करावा. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ते पैसे मिळावेत, अशी मागणी कर्जत तालुक्याचे नेते अॅड. कैलास शेवाळे यांनी केली.
बँकेच्या कार्यकारी संचालकांना अॅड. शेवाळे यांनी याबाबत पत्र दिले आहे. यामध्ये बँकेच्या विरोधात शेतकऱ्यांसाठी औरंगाबाद खंडपीठात खटला भरण्याचा इशारा दिला आहे. पत्रात शेवाळे यांनी पुढे म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील पाटेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना खरीप हंगाम (मृग भार) २०१६-१७ मध्ये सुमारे ६५ शेतकरी सभासदांनी उतरविला होता. यासाठी १ लाख ७७ हजार रुपये विमा डाळिंबाचा भरला आहे. मात्र, त्यांना विमा मंजूर झाला नाही. तसेच याच भागातील माहीजळगाव, चापडगाव, चिंचोली या परिसरातील शेतकऱ्यांनाही जिल्हा बँकेने पीक विमा मंजूर केला नाही.
याच भागातील माहीजळगाव परिसरातील ११ शेतकऱ्यांनी डाळिंबाचा स्वतःच पीक विमा उतरवला होता. त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने पीक विमा मंजूर केला आहे. याचा अर्थ खासगी कपंनीमार्फत उतरवलेला शेतकऱ्यांचा विमा व जिल्हा बँकेच्या सेवा संस्थेमार्फत उतरविलेला विमा यामध्ये जाणीवपूर्वक दुजाभाव करण्यात येत आहे. जिल्हा बँकेने तालुक्यातील राशिन, भांबोरा व कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा विमा मंजूर केला आहे, मग माहीजळगाव परिसरातील शेतकऱ्यांवर अन्याय का?
एकाच गावामध्ये व तालुक्यामध्ये त्याच कालवधीमध्ये वेगवेगळे हावामान कसे असू शकते? प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये वेगळे हवामान असते का? याचा खुलासा बँकेने करावा. पारनेर तालुक्यात वाडेगव्हाण, निघोज या जास्त लागवडीखाली असलेल्या सर्कलमधील विमा सुरुवातीस नाकारला होता; मात्र, आता पुन्हा सर्कलच्या आत मंजूर केला जातो. त्यामुळे माहीजळगाव परिसरातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान विमा न मिळाल्याने झाले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना पात्र असतानाही पीक विमा मिळाला नाही तर औरंगाबाद खंडपीठामध्ये बँकेच्या विरोधात खटला भरण्याचा इशारा निवेदनात शेवाळे यांनी दिला आहे.