म. टा. प्रतिनिधी, नगर
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष कर्जमाफीला सोमवारपासून (२३ ऑक्टोबर) वेग येणार आहे. शासनाकडून ग्रीन यादी आली असली तरी दिवाळीच्या चार दिवसांच्या सुट्टीच्या काळात या यादीतील नावांची तपासणी झालेली नाही. ती सोमवारपासून सुरू होणार असून, त्यानंतर अंतिम झालेली नावे शासनाला कळविली जाणार आहे. या नावांसमोर असलेली कर्ज थकबकी ‘निरंक’ करण्याचे आदेश शासनाकडून जिल्हा बँकेसह अन्य बँकांना आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही होणार आहे. किमान दोन-तीन दिवस या प्रक्रियेसाठी अपेक्षित मानले जात आहेत.
भाजप सरकारद्वारे बहुचर्चित शेतकरी कर्जमाफीचा लाभ दिवाळीपूर्वीच द्यायच्या उद्देशाने मागील १८ रोजी जिल्ह्यातील २६ शेतकऱी दाम्पत्यांना नगरमध्ये तर दोन शेतकरी दाम्पत्यांना मुंबईत बे-बाक प्रमाणपत्रे दिली गेली आहेत. पण, त्यांच्या कर्जखात्यावरील प्रत्यक्ष बे-बाक कार्यवाही अद्याप बाकी आहे. ती सोमवारनंतर मार्गी लागणार आहे. १९ ते २२ ऑक्टोबर यादरम्यान दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने त्या संपल्यावर आता कर्जमाफीची अंतिम अंमलबजावणी वेग घेणार आहे. ‘आपले सरकार’ वेबपोर्टलवर नगर जिल्ह्याची ग्रीन यादी झळकली असल्याने या यादीतील सर्व नावांबाबत आता लोकप्रतिनिधी नसल्याची खात्री केली जाणार आहे. त्यानंतर तालुकास्तरावरील तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे राहिलेल्या नावांची पुन्हा तपासणी होऊन ही नावे सरकारला कळवली जाणार आहेत. पूर्णपणे अंतिम झालेल्या या नावांसमोरील कर्ज थकबाकीची रक्कम ‘निरंक’ करण्याचे आदेश त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेसह जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना दिले जाणार आहेत. त्यानुसार तशी कार्यवाही करून, तसे केल्याचे बँकांद्वारे शासनाला कळवले जाणार असून, सरकारकडून ‘एकूण येणे रकमे’च्या मागणीचा प्रस्तावही दिला जाणार आहे. असे प्रस्ताव गेल्यानंतर सरकारकडून प्रत्येक बँकेत उघडण्यात आलेल्या स्वतंत्र कर्जमाफी खात्यात संबंधित रक्कम एकत्रितरित्या जमा केली जाणार आहे. या सगळ्या प्रक्रियेस किमान दोन-तीन दिवस लागणार आहेत.
सावधपणे निवड
‘आपले सरकार’ वेबपोर्टलवर कर्जमाफी मिळू शकेल अशा लाभार्थ्यांची पहिली पात्र यादी (ग्रीन यादी) पडण्यास वेळ लागल्याने कर्जमाफी प्रमाणपत्रे दिवाळीआधीच्या मुहूर्तावर देण्यास विलंब होण्याची शक्यता होती. मात्र, दिवाळीआधीची वेळ साधण्याच्या हेतूने सहायक निबंधक स्तरावरून पात्र ठरू शकतील अशा २८ जोडप्यांची नगरच्या कार्यक्रमासाठी तर दोन जोडप्यांची मुंबईच्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली होती. या सर्व ३० जोडप्यांना कर्जमाफीचा लाभ कमीतकमी ८ हजार ते जास्तीतजास्त सुमारे ५७ हजारापर्यंत मिळणार आहे. ६० हजाराच्या आत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची निवड प्रशासनाच्या सावधपणाचे दर्शन घडवून गेले आहे. या सर्वांना बे-बाक प्रमाणपत्र व मुख्यमंत्र्यांचे पत्र मिळाले असले तरी प्रत्यक्ष त्यांचे कर्जखाते निरंक होण्यासाठी बुधवार (२५ ऑक्टोबर) उजाडण्याची शक्यता आहे.
नगर जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेच्या २ लाख ५४ हजार ५७५ व अन्य सार्वजनिक बँकांच्या १ लाख २२ हजार २२९ अशा दोन्ही मिळून ३ लाख ७६ हजार ८०४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा दावा शासनाकडून केला जात असला तरी दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ यापैकी सुमारे ८४ हजार शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्याची रक्कम सुमारे ८५० कोटीची असल्याचे सांगितले जाते. मात्र, तालुकास्तरीय समितीद्वारे ग्रीन यादीच्या अंतिम छाननीनंतरच किती प्रस्ताव अंतिम होतात, य़ावर शेतकरी संख्या व कर्जमाफी लाभाची रक्कम निश्चित होणार आहे.
पिवळी व लाल यादीची तपासणी
शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिरवी, पिवळी व लाल अशा तीन याद्या सरकारने केल्या आहेत. हिरव्या यादीतील लाभार्थी पूर्ण पात्र मानले जातात. पिवळी यादीतील नावांबाबतची अतिरिक्त माहिती प्रलंबित आहे व लाल यादीतील नावे तात्पुरते अपात्र व विचाराधीन ठेवली आहेत. या दोन्ही पिवळी व लाल यादीतील नावांबाबतची आवश्यक पूर्तता येत्या २५ दिवसात करून त्यांनाही अंतिम ग्रीन यादीत समाविष्ट केले जाणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेही तपासणी सोमवारपासूनच सुरू होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष कर्जमाफीला सोमवारपासून (२३ ऑक्टोबर) वेग येणार आहे. शासनाकडून ग्रीन यादी आली असली तरी दिवाळीच्या चार दिवसांच्या सुट्टीच्या काळात या यादीतील नावांची तपासणी झालेली नाही. ती सोमवारपासून सुरू होणार असून, त्यानंतर अंतिम झालेली नावे शासनाला कळविली जाणार आहे. या नावांसमोर असलेली कर्ज थकबकी ‘निरंक’ करण्याचे आदेश शासनाकडून जिल्हा बँकेसह अन्य बँकांना आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही होणार आहे. किमान दोन-तीन दिवस या प्रक्रियेसाठी अपेक्षित मानले जात आहेत.
भाजप सरकारद्वारे बहुचर्चित शेतकरी कर्जमाफीचा लाभ दिवाळीपूर्वीच द्यायच्या उद्देशाने मागील १८ रोजी जिल्ह्यातील २६ शेतकऱी दाम्पत्यांना नगरमध्ये तर दोन शेतकरी दाम्पत्यांना मुंबईत बे-बाक प्रमाणपत्रे दिली गेली आहेत. पण, त्यांच्या कर्जखात्यावरील प्रत्यक्ष बे-बाक कार्यवाही अद्याप बाकी आहे. ती सोमवारनंतर मार्गी लागणार आहे. १९ ते २२ ऑक्टोबर यादरम्यान दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने त्या संपल्यावर आता कर्जमाफीची अंतिम अंमलबजावणी वेग घेणार आहे. ‘आपले सरकार’ वेबपोर्टलवर नगर जिल्ह्याची ग्रीन यादी झळकली असल्याने या यादीतील सर्व नावांबाबत आता लोकप्रतिनिधी नसल्याची खात्री केली जाणार आहे. त्यानंतर तालुकास्तरावरील तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे राहिलेल्या नावांची पुन्हा तपासणी होऊन ही नावे सरकारला कळवली जाणार आहेत. पूर्णपणे अंतिम झालेल्या या नावांसमोरील कर्ज थकबाकीची रक्कम ‘निरंक’ करण्याचे आदेश त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेसह जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांना दिले जाणार आहेत. त्यानुसार तशी कार्यवाही करून, तसे केल्याचे बँकांद्वारे शासनाला कळवले जाणार असून, सरकारकडून ‘एकूण येणे रकमे’च्या मागणीचा प्रस्तावही दिला जाणार आहे. असे प्रस्ताव गेल्यानंतर सरकारकडून प्रत्येक बँकेत उघडण्यात आलेल्या स्वतंत्र कर्जमाफी खात्यात संबंधित रक्कम एकत्रितरित्या जमा केली जाणार आहे. या सगळ्या प्रक्रियेस किमान दोन-तीन दिवस लागणार आहेत.
सावधपणे निवड
‘आपले सरकार’ वेबपोर्टलवर कर्जमाफी मिळू शकेल अशा लाभार्थ्यांची पहिली पात्र यादी (ग्रीन यादी) पडण्यास वेळ लागल्याने कर्जमाफी प्रमाणपत्रे दिवाळीआधीच्या मुहूर्तावर देण्यास विलंब होण्याची शक्यता होती. मात्र, दिवाळीआधीची वेळ साधण्याच्या हेतूने सहायक निबंधक स्तरावरून पात्र ठरू शकतील अशा २८ जोडप्यांची नगरच्या कार्यक्रमासाठी तर दोन जोडप्यांची मुंबईच्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली होती. या सर्व ३० जोडप्यांना कर्जमाफीचा लाभ कमीतकमी ८ हजार ते जास्तीतजास्त सुमारे ५७ हजारापर्यंत मिळणार आहे. ६० हजाराच्या आत लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची निवड प्रशासनाच्या सावधपणाचे दर्शन घडवून गेले आहे. या सर्वांना बे-बाक प्रमाणपत्र व मुख्यमंत्र्यांचे पत्र मिळाले असले तरी प्रत्यक्ष त्यांचे कर्जखाते निरंक होण्यासाठी बुधवार (२५ ऑक्टोबर) उजाडण्याची शक्यता आहे.
नगर जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेच्या २ लाख ५४ हजार ५७५ व अन्य सार्वजनिक बँकांच्या १ लाख २२ हजार २२९ अशा दोन्ही मिळून ३ लाख ७६ हजार ८०४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा दावा शासनाकडून केला जात असला तरी दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ यापैकी सुमारे ८४ हजार शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. त्याची रक्कम सुमारे ८५० कोटीची असल्याचे सांगितले जाते. मात्र, तालुकास्तरीय समितीद्वारे ग्रीन यादीच्या अंतिम छाननीनंतरच किती प्रस्ताव अंतिम होतात, य़ावर शेतकरी संख्या व कर्जमाफी लाभाची रक्कम निश्चित होणार आहे.
पिवळी व लाल यादीची तपासणी
शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिरवी, पिवळी व लाल अशा तीन याद्या सरकारने केल्या आहेत. हिरव्या यादीतील लाभार्थी पूर्ण पात्र मानले जातात. पिवळी यादीतील नावांबाबतची अतिरिक्त माहिती प्रलंबित आहे व लाल यादीतील नावे तात्पुरते अपात्र व विचाराधीन ठेवली आहेत. या दोन्ही पिवळी व लाल यादीतील नावांबाबतची आवश्यक पूर्तता येत्या २५ दिवसात करून त्यांनाही अंतिम ग्रीन यादीत समाविष्ट केले जाणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेही तपासणी सोमवारपासूनच सुरू होणार आहे.