म. टा. वृत्तसेवा, पाथर्डी
भगवानगडावर मला केवळ दसरा मेळाव्यासाठी २० मिनिटे द्या, अशी विनंती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गडाचे महंत नामदेव शात्री यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. यावर, आपण मुंडे यांचे स्वागत करू; मात्र, भाषण करू देणार नाही, अशी भूमिका नामदेव शास्त्री यांनी घेतल्याने दसरा मेळावा होणार की नाही याबाबत चर्चेला उधाण आले आहे. दसरा मेळावा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी गडावर दसरा मेळावा घेऊ द्या, अशी मागणी प्रशासनाकडे केली असून या संदर्भात प्रशासन काय भूमिका घेणार याकडे भगवानगड भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा वाद चांगलाच चिघळला असून पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांना एक भावनिक आवाहन करणारे पत्र देऊन गडावर मेळावा घेऊ देण्याची परवानगी मागितली. हे पत्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती अर्जुन शिरसाठ, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे व माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी गडावर जाऊन नामदेव शास्त्री यांना दिल्यानंतर नामदेवशास्त्री यांनी, आपण मुंडे यांचे दसऱ्याच्या दिवशी गडावर स्वतः स्वागत करू; मात्र, गडावर कोणालाही भाषण करू देण्यास मात्र आपला विरोध राहील, असे पत्र घेऊन जाणाऱ्या तिघांनाही सांगितल्याने मुंडे नामदेव शास्त्री वाद आणखी चिघळला असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, समजलेल्या माहितीनुसार मंत्री मुंडे यांनी पत्र घेऊन जाणारे शिरसाठ, गर्जे व आव्हाड यांच्याशी मोबाइलवरून चर्चा करून माहिती घेतली. या नंतर पत्रकारांशी बोलताना दसरा मेळावा कृती समितीचे कार्यकर्ते माजी आमदार दगडू पाटील बडे म्हणाले की, नामदेव शास्त्री यांना गादीवर बसवते वेळी गोपीनाथ मुंडे यांनी अनेकांचा रोष पत्करला. त्या वेळी मुंडे यांच्या गाडीत बिघाड झाल्याने ते मोटारसायकलवर बसून गडावर आले होते. पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांना विनंती केली असून या विनंतीला मान देण्याची सद्बुद्धि नामदेव शास्त्री यांना व्हावी.
नगरसेवक अरुण मुंडे म्हणाले की, ९५ टक्के जनतेची मानसिकता ही गडावर मेळावा व्हावा, अशी असून नामदेव शास्त्री हे हटवादी भूमिका घेऊन समाजाला वेठीस धरत आहेत. त्यांनी आपली भूमिका बदलावी. सतीश पालवे म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत मेळावा गडावरच होणार असून कोणी कितीही विरोध केला तरीही जमलेले भाविक हे विरोध मोडून काढून गडावर जाणार व मुंडे यांना भाषण करण्यास भाग पडणार आहेत.
डॉ. मृत्युंजय गर्जे, माणिक खेडकर, अमोल गर्जे, जे. बी. वांढेकर, मुकुंद गर्जे, राहुल कारखेले आदी उपस्थित होते. दरम्यान, दसरा मेळावा कृती समितीचे कार्यकर्ते माणिक खेडकर व मुकुंद गर्जे यांनी दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर पंकजा मुंडे यांना मेळावा घेऊ देण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे केली असून सायंकाळी उशिरापर्यंत या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता.
भगवानगडावर मला केवळ दसरा मेळाव्यासाठी २० मिनिटे द्या, अशी विनंती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गडाचे महंत नामदेव शात्री यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. यावर, आपण मुंडे यांचे स्वागत करू; मात्र, भाषण करू देणार नाही, अशी भूमिका नामदेव शास्त्री यांनी घेतल्याने दसरा मेळावा होणार की नाही याबाबत चर्चेला उधाण आले आहे. दसरा मेळावा कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी गडावर दसरा मेळावा घेऊ द्या, अशी मागणी प्रशासनाकडे केली असून या संदर्भात प्रशासन काय भूमिका घेणार याकडे भगवानगड भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा वाद चांगलाच चिघळला असून पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांना एक भावनिक आवाहन करणारे पत्र देऊन गडावर मेळावा घेऊ देण्याची परवानगी मागितली. हे पत्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती अर्जुन शिरसाठ, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे व माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी गडावर जाऊन नामदेव शास्त्री यांना दिल्यानंतर नामदेवशास्त्री यांनी, आपण मुंडे यांचे दसऱ्याच्या दिवशी गडावर स्वतः स्वागत करू; मात्र, गडावर कोणालाही भाषण करू देण्यास मात्र आपला विरोध राहील, असे पत्र घेऊन जाणाऱ्या तिघांनाही सांगितल्याने मुंडे नामदेव शास्त्री वाद आणखी चिघळला असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, समजलेल्या माहितीनुसार मंत्री मुंडे यांनी पत्र घेऊन जाणारे शिरसाठ, गर्जे व आव्हाड यांच्याशी मोबाइलवरून चर्चा करून माहिती घेतली. या नंतर पत्रकारांशी बोलताना दसरा मेळावा कृती समितीचे कार्यकर्ते माजी आमदार दगडू पाटील बडे म्हणाले की, नामदेव शास्त्री यांना गादीवर बसवते वेळी गोपीनाथ मुंडे यांनी अनेकांचा रोष पत्करला. त्या वेळी मुंडे यांच्या गाडीत बिघाड झाल्याने ते मोटारसायकलवर बसून गडावर आले होते. पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांना विनंती केली असून या विनंतीला मान देण्याची सद्बुद्धि नामदेव शास्त्री यांना व्हावी.
नगरसेवक अरुण मुंडे म्हणाले की, ९५ टक्के जनतेची मानसिकता ही गडावर मेळावा व्हावा, अशी असून नामदेव शास्त्री हे हटवादी भूमिका घेऊन समाजाला वेठीस धरत आहेत. त्यांनी आपली भूमिका बदलावी. सतीश पालवे म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत मेळावा गडावरच होणार असून कोणी कितीही विरोध केला तरीही जमलेले भाविक हे विरोध मोडून काढून गडावर जाणार व मुंडे यांना भाषण करण्यास भाग पडणार आहेत.
डॉ. मृत्युंजय गर्जे, माणिक खेडकर, अमोल गर्जे, जे. बी. वांढेकर, मुकुंद गर्जे, राहुल कारखेले आदी उपस्थित होते. दरम्यान, दसरा मेळावा कृती समितीचे कार्यकर्ते माणिक खेडकर व मुकुंद गर्जे यांनी दसऱ्याच्या दिवशी भगवानगडावर पंकजा मुंडे यांना मेळावा घेऊ देण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे केली असून सायंकाळी उशिरापर्यंत या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता.